म्हसळा ग्रामीण रूग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात आयुष्यमान भव: आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन.


कार्यक्रमाच्या औचीत्याने संजय खांबेटे यांनी केला नेत्रदान करण्याचा मानस.
म्हसळा - रायगड
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारच्या वतीने संपुर्ण देशभरात अत्यंत महत्वाकांक्षी आयुष्यमान भव मोहीम राबविण्यात येत असून रुग्णांना त्यांचे आजाराचे उपचारांवर शासनाच्या वतीने ५ लक्ष रुपयांपर्यंत मोफत उपचार करून आरोग्य सेवा देण्यात येणार आहे.या योजनेचा शुभारंभ केंद्रीय स्तरावर महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचे हस्ते करण्यात आला आहे. राज्यात वेगवेगळ्या स्तरावर विविध मान्यवरांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले असताना म्हसळा ग्रामीण रूग्णालयात आयुष्मान भव मोहिमेचे उद्घाटन तहसीलदार समिर घारे यांचे हस्ते तर प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण कल्याण समिती सदस्य अशोक काते यांच्या हस्ते करण्यात आले.या योजने अंतर्गत येणारे सर्व आजार आणि त्यावरील उपचार पद्धती बाबत वैद्यकिय अधीक्षक डॉ.महेश मेहता,डॉ. भावना,डॉ.संद्या पाटिल यांनी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.कार्यक्रमाला माजी सभापती महादेव पाटील,रुग्ण कल्याण समिती सदस्य सचिन करडे, ज्येष्ठ पत्रकार संजय खांबेटे,माजी सभापती छाया म्हात्रे,नगरसेविका राखी करंबे,शगुप्ता जहाँगीर, डॉ.शिर्के,डॉ.अलंकार करंबे,डॉ.प्रशांत गायकवाड, बांधंनकर,परिचारिका,श्रीम.साधना,आरोग्य सहा.सुरेश म्हात्रे,इंद्रसेन पानगे,श्रिकेश पाटील,समाजसेवक सुशांत लाड,दयानंद महामुंनकर,विनोद ठाकुर,ऋषीकेश मुंडे,अनंत कांबले,मंगेश ठाकुर, योगेश पुरणकर,ज्योती महाडीक,रीना धनावडे,कविता गठडी, गीतांजली पाटील,सुजाता पाटील,सर्व परिचारिका आरोग्य सेविका,आशा,मदतनीस आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेश मेहता यांनी करताना या योजने अंतर्गत वेगवेगळ्या स्तरावर आरोग्य तपासणी व उपचार पद्धती बाबत सविस्तर माहिती दिली.म्हसळा तालुक्यात गेली २५ वर्षे टी बी या रोगावर निधान करताना आपणास ७० टक्के यश संपादन करता आले आहे सन २०३० पर्यंत म्हसळा तालुका १०० टक्के टी बी मुक्त होईल असे यश प्राप्त करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.या वेळी अवघ्या सहा महिन्यांत रुग्णांवर योग्य उपचार करून पुर्ण बरे झालेल्या रुग्णांचा तहसिलदार समिर घारे यांचे हस्ते प्रशस्ती पत्र देवुन गौरव करण्यात आले.कार्यक्रमात  अवयव दान करा असे डॉ.महेश मेहता यांनी आवाहन करताना प्रथम जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे यांनी डोळे दान करण्यासाठी त्यांचे नावाची नोंद केली.उपस्थितांनी कार्यक्रमात अवयव दान करणे बाबत संयुक्तीक शपथ घेतली.तालुक्यातील रवप्रभा स्वयंसेवी संस्था मार्फत काही टी बी रूग्णांना दत्तक  घेतले आसुन त्यांना सकस आहार व उपचार बाबत योग्य सहाय्य केले जात असल्याने संस्थेचे संचालक सुशांत लाड,संतोष उद्धरकर यांना प्रमाणपत्र देवुन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाला माजी सभापती महादेव पाटील,तहसीलदार समिर घारे,डॉ. महेश मेहता,श्रीमती भावना यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत डॉ. मेहता यांनी तर आभार डॉ.संध्या पाटिल यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा