(उदय कळस )
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या माझी माती माझा देश अभियान अंतर्गत शहरामध्ये प्रभागनिहाय कलश शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले. एकूण १७ प्रभागामध्ये हि शोभा यात्रा कलश फिरविण्यात आला. या शोभा यात्रेत मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, उपनगराधक्ष संजय दिवेकर, गटनेते तथा विद्यमान नगरसेवक संजय कर्णिक, माजी नगराध्यक्ष जयश्री कापरे, नगरसेविका सौ. राखी करंबे, मंगेश म्हशीलकर,करनिर्धारण अधिकारी दिपाली मुंडये, नगरपंचायत्तीतील कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, न्यू इंग्लिश स्कूल चे विद्यार्थी आदि मान्यवर सहभागी झाले होते. शोभा यात्रेतील कलशामध्ये १७ प्रभागातील मूठभर माती टाकून एक कलश जिल्हाधिकारी यांचकडे पाठऊन संपूर्ण जिल्ह्याचा एक कलश दिल्लीला पाठविला जाणार असल्याचे मुख्याधिकारी विठ्ठल राठोड यांनी सांगितले. तसेच या उपक्रमानंतर्गत संपूर्ण शहराची स्वच्छता कायम राखली जाईल असेही विठ्ठल राठोड यांनी सांगून शहरातील नागरिक, प्रशासन आणी लोकप्रतिनिधी यांचे अतिशय मोलाचे सहकार्य लाभल्याचेही राठोड यांनी सांगितले.
Post a Comment