श्रीवर्धन येथे शेकापचा वर्धापन दिन साधेपणात संपन्न

 श्रीवर्धन येथे शेकापचा वर्धापन दिन साधेपणात संपन्न




 मकरंद जाधव-बोर्लीपंचतन  

शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन श्रीवर्धन येथे शेकापचे माजी आमदार पंडीतशेठ पाटील यांच्या सुलभा सदन निवास्थानाच्या प्रांगणात मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला.

कोरोनाच्या प्रार्श्वभुमिवर सामाजिक भान राखून दरवर्षीच्या परंपरेनुसार साजरा होणारा वर्धापन दिन यावर्षीसुध्दा सर्वांच्या आरोग्याची काळजी घेऊन प्रत्येक गावागावात आणि तालुक्याच्या ठिकाणी शासनाच्या सर्व निमयांचे पालन करुनच सकाळी दहा वाजता प्राथमिक स्वरुपात ध्वजारोहण करावे असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा चिटणीस अ‍ॅड.आस्वाद पाटील यांनी केले होते त्या अनुषंगाने श्रीवर्धन येथे तालुका चिटणीस वसंत यादव यांच्या उपस्थितीत बोर्लीपंचतन येथील शेकापचे जेष्ठ नेते विलास तोडणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी वसंत यादव यानी आपल्या भावना व्यक्त करताना सांगीतले की "शेतकरी कामगार पक्ष हा सामाजिक ऐक्याची,बंधुत्वाची ज्योत प्रत्येकाच्या हृदयात प्रज्वलित करून गरीब,दुःखी, शोषित,पिडीत सागरपुत्र आणि वनवासी यांचे अश्रू पुसण्याचे काम प्रामाणिकपणे करत आहे.महागाई मध्ये होरपळलेल्या जनतेला चार घास सुखाचे खायचे असतील तर शेकाप शिवाय पर्याय नाही." 

याप्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे श्रीपाल कवाडे,लिलाधर खोत,विश्वास तोडणकर,अमित पाटील,ओमकार खोत,अनिकेत खोत,अरुण मांजरेकर, सुधीर पाखड,अंन्सार चोगले,अथर पांगारकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा