७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संत निरंकारी मिशन द्वारे वननेस-वन परियोजनेचा शुभारंभ
म्हसळा येथे २०० वृक्षांची लागवड
‘वृक्षाची छाया, वृद्धांची माया’ सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज
म्हसळा: प्रसाद पारावे
21 ऑगस्ट, 2021: भारताच्या ७५व्या स्वातंत्रय दिनाच्या निमित्ताने संत निरंकारी मिशनद्वारे ‘अर्बन ट्री क्लस्टर’ (नागरी वृक्ष समूह) अभियानाचा शुभारंभ करण्यात आला ‘Oneness-Vann’ (वननेस-वन) नामक या परियोजनेचा सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शुभहस्ते आज २१ ऑगस्ट, २०२१ रोजी करण्यात आला. संपूर्ण भारतातील २२ राज्यांच्या २८० शहरांमध्ये निवडक ३५० ठिकाणी या योजनेअंतर्गत सुमारे १,५०,००० रोपांची लागवड करण्यात आली. येत्या काळात या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या महाअभियानाअंतर्गत संत निरंकारी मिशनच्या सेवादार व भाविक-भक्तगणांची महत्वपूर्ण भूमिका असेल. या मोहिमेमध्ये संत निरंकारी मिशन व्यतिरिक्त केंद्र व राज्य सरकार, स्थानिक प्रशासन, शैक्षणिक संस्था व आर.डब्ल्यू.ए. इत्यादीमधील लोकही सहभागी होतील.
या परियोजने अंतर्गत रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथे २०० इतकी झाडे लावण्यात आली आहेत. याप्रसंगी म्हसळा नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनोज उकिर्डे साहेब, वडवली ब्रँचचे मुखी गणेशजी नाक्ती, हिरामणजी चव्हाण उपस्थित होते.त्यांनी वननेस-वन अभियानाची स्तुती करत असतानाच मिशनच्या विविध सामाजिक उपक्रमांचे व मानवतावादी आध्यात्मिक कार्याचे कौतुक केले. वृक्षारोपण करण्यासाठी मिशनचे रायगड ४०अ चे क्षेत्रीय प्रभारी प.आ. प्रकाश म्हात्रे जी, सेवादलाचे क्षेत्रीय संचालक प.आ. प्रविण पाटील जी तसेच स्थानिक प्रबंधक यांच्या मार्गदर्शनाखाली सेवादलचे स्थानिक अधिकारी व स्वयंसेवक यांनी अथक परिश्रम करुन वृक्षारोपणाचे कार्य पार पाडले.
या अभियानाचा प्रारंभ करताना सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज म्हणाल्या, “प्राणवायु, जो आम्हाला या वृक्षांपासून प्राप्त होत असतो त्याचे धरतीवर संतुलन ठेवण्यासाठी वनांची निर्मिती करणे आवश्यक आहे. जेवढे अधिक वृक्ष लावू तेवढीच अधिक ऑक्सिजनची निर्मिती होईल आणि तेवढीच शुद्ध हवाही प्राप्त होईल.
ज्याप्रमाणे वननेस-वन चे स्वरूप अनेकतेत एकतेचे दृश्य प्रस्तुत करते तद्वत मानवानेही समस्त विसरुन शांतीपूर्ण सह-अस्तित्वाच्या भावनेने एकोप्याने राहून जगाचे सौंदर्य वाढवण्याची गरज आहे.
माता सुदीक्षाजी यांनी World Senior Citizen’s Day चा उल्लेख करुन सांगितले की ‘वृक्षांची छाया, वृद्धांची माया’ या उक्तीप्रमाणे जसे ज्येष्ठांचे आशीर्वाद आमच्यासाठी आवश्यक आहेत तद्वत वृक्षदेखील आमच्या जीवनासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत.
वननेस-वन नामक या परियोजने अंतर्गत संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षांचे समूह (Tree Clusters) लावण्यात येतील. त्यांच्या वाढत्या संख्येच्या प्रभावाने आजुबाजूचे वातावरण प्रदूषित होण्यापासून वाचू शकेल आणि स्थानिक तापमान सुद्धा नियंत्रणात राहील. हे वृक्ष स्थानिक जलीवायु आणि भौगोलिक परिस्थितीनुसारच लावण्यात येणार आहेत. संत निरंकारी मिशनचे सेवादार वृक्षांची लागवड केल्यानंतर सतत तीन वर्षे त्यांची देखभाल करतील. त्यामध्ये वृक्षांचे रक्षण, खत व पाण्याची उचित व्यवस्था इत्यादिंचा समावेश आहे.
आज जेव्हा आमची धरती ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येचा सामना करत आहे, अशा समयी वृक्षारोपणाचे महत्व आणखी अधिक वाढलेले आहे. सन २०२० पासून कोरोना संकटाने आपल्या सर्वांनाच प्रकृतीची अनमोल देणगी असलेल्या प्राणवायुचे म्हणजेच ऑक्सिजनचे महत्व काय आहे ते चांगले शिकवले आहे. शिवाय त्याच्या उणीवेमुळे उत्पन्न होणाऱ्या दुष्परिणामांशीही आम्हाला अवगत केले आहे. आपल्याला हे ध्यानात ठेवायला हवे, की मानवी शरीरामध्ये जीवंतपणा असल्याचे प्रतीक हा प्राणवायुच आहे जो आपल्याला या वनश्रीपासून प्राप्त होतो.
हे सर्व विदित आहे की, संत निरंकारी मिशन हे एक विश्वस्तरीय आध्यात्मिक व्यासपीठ आहे जे सर्वांभूती निराकार ईश्वराची अनुभूती बाळगून प्रेम, सहिष्णुता व सद्भावपूर्ण एकत्वाच्या विचारधारेमध्ये विश्वास बाळगते. मिशनमार्फत पर्यावरण सुरक्षेसाठी सातत्याने कार्य करण्यात येत आहे. वेळोवेळी देशभर वृक्षारोपण व त्यांचे संरक्षण, जल संरक्षण, घनकचरा प्रबंधन (Waste Management) आणि प्लास्टिकचा उपयोग न करणे यांसारख्या अभियानांमध्ये पुढाकार घेत आले आहे.
संत निरंकारी मिशन पर्यावरण रक्षणासाठीदेखील सातत्याने कार्य करत आहे. या प्रक्रियेमध्ये मिशनकडून वेळोवेळी देशभर वृक्षारोपण व संगोपन, जल संरक्षण, कचरा व्यवस्थापन आणि या व्यतिरिक्त संत निरंकारी मिशन मानवतेच्या सेवेमध्ये सदैव अग्रेसर राहिलेले आहे. कोरोना महामारीच्या काळात संक्रमित रुग्णांच्या उपचारासाठी मिशनकडून देशभरातील विविध सत्संग भवनांना ‘कोविड केअर सेंटर’च्या रूपात परिवर्तित करुन संबंधित सरकारांना उपलब्ध करण्यात येत आहे ज्यामध्ये रुग्णांच्या भोजनाची उचित व्यवस्था मिशनमार्फत करण्यात येत असून डॉक्टर्स, नर्सेस, मेडिकल इक्विपमेंटस, औषधे इत्यादि मेडिकल सुविधा सरकार मार्फत उपलब्ध केल्या जात आहेत. याच कार्या अंतर्गत दिल्लीतील बुराड़ी रोड स्थित ग्राउंड नं.8 वरील विशाल सत्संग भवनामध्ये 1000 बेडचे कोविड केअर सेंटर निर्माण करण्यात आले आहे. याशिवाय पंचकुला, पुणे, पानीपत, यमुनानगर, उधमपुर, इत्यादि ठिकाणच्या सत्संग भवनांना यापूर्वीच ‘कोविड केअर सेंटर’ अथवा ‘व्हॅक्सीनेशन सेंटर’च्या रूपात विकसीत करुन संबंधित सरकार/प्रशासकीय यंत्रणांना सुपूर्द करण्यात आली आहेत. याशिवाय कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या विषम परिस्थितीमध्ये ऑक्सीजनची टंचाई निर्माण झाल्यानंतर संत निरंकारी मिशनकडून १००० पेक्षा अधिक ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स देशातील विविध राज्यांना प्रदान करण्यात आले. त्याठिकाणी निरंतर सेवा जारी आहेत.
संत निरंकारी मिशन आणि ‘गिव्ह मी ट्री संस्था’ यांच्या सहकार्यानेच एवढ्या मोठ्या स्तरावर ‘पर्यावरण संरक्षण’ विषयक या योजनेचा पाया घातला गेला आहे. ‘गिव्ह मी ट्री संस्था’ मागील 44 वर्षांपासून कार्य करत असून त्यांनी आतापर्यंत 3.25 करोड़ वृक्ष लावले आहेत.
मिशन आणि ‘गिव्ह मी ट्री ट्रस्ट’ च्या सहयोगात्मक प्रयत्नांतून साकार होत असलेला हा उपक्रम राष्ट्राला ‘पर्यावरण संरक्षणाच्या’ हेतुने एक नवे परिमाण स्थापन करण्यामध्ये मदत करील.
संत निरंकारी मिशन कडून दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस मुक्ती पर्व दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने यावर्षी व्हर्च्युअल रूपात संत समागमाचे आयोजन करण्यात आले. एका बाजुला कित्येक शतकांपासून असलेल्या पारतंत्र्यातून मुक्त करणाऱ्या भारतीय स्वातंत्र्य सेनानींचे या दिवशी स्मरण केले जाते त्याचबरोबर जनसामान्यांच्या आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या दिव्य विभूती; जसे शहनशाह बाबा अवतार सिंह जी, जगतमाता बुद्धवंतीजी, निरंकारी राजमाता कुलवंत कोरजी, सद्गुरु माता सविंदर हरदेवजी तसेच अशा अनेक भक्तांना ‘मुक्ती पर्व’ रूपात श्रद्धा सुमने अर्पण करत असतानाच त्यांच्या जीवनातून प्रेरणा प्राप्त केली जाते.
निरंकारी संत समागमाची जगभरातील लक्षावधी प्रभुप्रेमी आतुरतेने वाट पाहत असतात की, केव्हा हा वार्षिक संत समागम येईल आणि त्यामध्ये सहभागी होऊन सद्गुरुंच्या आशीर्वादांचे पात्र बनता येईल तसेच जगभरातील संत कवी, गीतकार व वक्त्यांची मधूर वचने श्रवण करावयास मिळतील. भक्तांचा हा उत्साह पाहून सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांनी यावर्षी ७४व्या आंतरराष्ट्रीय निरंकारी संत समागमाच्या तारखा- २७, २८ व २९ नोव्हेंबर, २०२१ अशा जाहीर केल्या आहेत. सभी प्रभु प्रेमी समागमामध्ये सौहार्दपूर्ण एकोप्याच्या भावनेने युक्त होऊन स्वत:ला निराकार ईश्वराशी जोडून जगासाठी एक आदर्श उदाहरण यप्रस्तुत करतील की, प्रभु इच्छेला सर्वोपरी मानून कशाप्रकारे आनंदीत जीवन जगता येते.
Post a Comment