बोर्लीपंचतन मध्ये मोबाईल नेटवर्क कंपन्यांच्या सेवेचा उडाला फज्जा ; शिवसेनेचा आक्रमक आंदोलनाचा इशारा .


बोर्लीपंचतन मधील बी एस् एन एल ,व्होडाफोन व इतर मोबाईल नेटवर्क कंपन्यांच्या सेवेचा उडाला फज्जा : ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण. ; शिवसेनेचा तोडफोडीच्या आक्रमक आंदोलनाचा इशारा .

बोर्ली-पंचतन : अमोल चांदोरकर 
श्रीवर्धन तालूक्यातील बोर्लीपंचतन, दिवेआगर, शिस्ते, वडवली, वेळास भरडखोल या गावांमध्ये बी एस् एन एल सह मोबाईल नेटवर्क देणाऱ्या व्होडाफोन, आयडिया व इतर कंपन्यांच्या नेटवर्क सेवेचा गेल्या अनेक महिन्यांपासून फज्जा उडालेला दिसत आहे.यामुळे ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील मुख्य व मध्यवर्ती असणारी 
बोर्लीपंचतन बाजारपेठ आहे. श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन सोबतच परिसरामध्ये सध्या दूरध्वनी सेवेमधून कोरोनाच्या संबंधित बातम्या ,वादळात झालेले नुकसान किंवा अत्यावश्यक सेवेतील गोष्टी या मोबाईल द्वारे कराव्या यासाठी ग्राहक आतूरलेले असतात, बोर्लीपंचतन शेजारी आजूबाजूला असलेले दिवेआगर तसेच शिस्ते, भरडखोल, वडवली, तसेच इतरही छोटी मोठी गावे आहेत, बोर्लीपंचतनमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, आणि दिवेआगर येथे बँक ऑफ इंडिया तर काही पतसंस्था व मच्छीमारी सोसायटी व इतरही म्हत्वाची कार्यालये आहेत.त्यांची देखील बरीच कामे नेटवर्क नसल्याने ठप्प असतात.

सध्या इंटरनेटच्या युगामध्ये सर्व कार्यालये,सरकारी दप्तरे ऑनलाईन पद्धतीने जोडली गेली आहेत. परंतु सध्या नेटवर्क देणाऱ्या कंपनीच्या सेवेला घरघर लागली असून नेटवर्क नसण्याचे प्रकार वाढले आहेत ग्राहकांनी केलेले दोन व तीन महिन्यांचे रिचार्जे कोणत्याही प्रकारची इंटरनेट सुविधा न वापरता संपत असल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत. मागील वर्ष भरा पासून खंडित होणाऱ्या सेवेकडे अधिकारी सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे व्होडाफोन, आयडिया, अशा स्वरूपातील असलेली मोबाइल नेटवर्क किंवा इंटरनेट सेवा गेल्या अनेक वर्षापासून साफ कोलडमली असल्याचे दिसत असून,श्रीवर्धन शहर तसेच म्हसळा शहर या ठिकाणी सर्वत्र सर्वच कंपन्यांचे नेटवर्क सुरळीत चालू आहेत मात्र श्रीवर्धन शहरातील आकाराने तसेच लोकसंख्येने व मुख्य बाजारपेठ असेलेले बोर्ली-पंचतन शहर या कडे अधिकारी का दुर्लक्ष करीत आहेत असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

सामान्य जनतेला याचा नाहक त्रास होत आहे. आपले शहरी भागात अडकलेले आप्तेष्ट यांच्याशी संपर्क होत नसल्याने वारंवार तक्रार देऊनही मोबाइल कंपन्या लक्ष नसल्यासारख्या अविर्भावात आहेत. वारंवार तलाठी ऑफीस, ग्रामपंचायत यांच्याकडेही सामान्य जनतेने तक्रार मांडली आहेच, हीच तक्रार टेलिकॉम कंपन्यांना सुध्दा दिली आहे. परंतू तक्रार निवारण काहीच होताना दिसत नाही.

सामान्य जनतेसोबत बोर्लीपंचतन परिसरातील दिघी-सागरी पोलीसठाणे यांनासुद्धा गरजेची इंटरनेट सुविधा दिली तर आहेच पण कोलमडलेल्या अवस्थेत मोबाइल कंपन्या उभ्या आहेत, यासर्वांकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे, नाहीतर बोर्लीपंचतन परिसराची अवस्था २०२० सालात सुध्दा कणा मोडल्यासारखी राहील. ग्राहक सर्वच दुरध्वनी व मोबाईल सेवेला त्रासली असून कंपनी सुरळीत व उत्तम दर्जाची सेवा केव्हा देणार असा प्रश्न नागरिकांना मध्ये आहे या सेवेचा मागील काही महिन्या पासून फज्जा उडाला असून यामुळे ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत आहे परंतु या सेवेकडे कोणतेही अधिकारी चांगल्या व अखंडित सेवेसाठी तत्पर दिसत नसल्याने दूरध्वनी व मोबाईल नेटवर्किंग सेवेबाबत नाराजी व्यक्त होत आहे. या बाबत रायगड जिल्हा व्होडाफोन ,आयडिया चे एरिया सर्व्हिस मॅनेजर गौरव चाब्रा यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्या कडून कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही व त्या नंतर संपर्क झाला नाही .

नेटवर्क कंपन्यांची जाणून बुजून बोर्ली-पंचतन शहराकडे दुर्लक्ष होत आहे मात्र आता सहन शक्तीचा अंत झाला आहे येत्या सात ते आठ दिवसात नेटवर्क सुरळीत झाला नाही तर पुढे होणाऱ्या नुकसानी साठी पूर्णपणे नेटवर्क कंपन्या जबाबदार राहतील.
सुकुमार तोंडलेकर, शिवसेना,उपतालुका प्रमुख ,श्रीवर्धन 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा