येरे येरे पावसा तुला देतो पैसा...पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजाची पीक वाचविण्यासाठी धडपड


तळा(किशोरपितळे) 
कोकणात भात पिक हे एकमेव  पिक असुन पावसावर अवलंबून असते.पुर्वी(कुलाबा) रायगड जिल्हाला भाताचे कोठार समजले जायचे. निसर्गाच्या बदलत्या लहरी वातावरणावर अवलंबून असल्याने व आधुनिक युगातअसल्याने भात पिकांचे उत्पादन फारच कमी होत चालले आहेत त्याला कारणीभूत परिस्थिती झाली आहे पण तरीही ग्रामीण भागातीलशेतकरी जमेल त्याप्रमाणे शेती करीतआहेत.
यंदा मात्र सर्व बाजूने संकट आली आहेत.कोरोना महामारी,निसर्ग चक्रीवादळ, व त्यात झालेले नुकसान लाँकडाऊनमुळेआर्थिक मंदी,आणी पंधरादिवसापासून पावसाने मारलेली दांडी यामुळे बळीराजा चांगलाच हवालदिल झाला आहे. त्यामुळे शेतकरी आता येरे येरे पावसा तुला देतो पैसा.. असे शेताच्या बांधावर बसून म्हणू लागला आहे.शेती बरोबर अंतर्गत पिके देखील घेत असतो.ग्रामीण भागात पावसाच्या पाण्यावर आधारित भाजीपाला व भात शेतीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते परंतु काही शेतकरी धूळ वापे १ जून पुर्वी पेरणी केल्याने भात रोपे लागवडीस योग्य झाले आहेत तळा तालुक्यातील व सभोवतालच्या परिसरात पावसा अभावी कोवळी पिके पिवळी पडून कोमेजून जाऊ लागली आहेत तसेच या भागात पावसाच्या पाण्यावर आधारित शेतकरी काकडी,कारली, शिराळी, मिरची,भेंडी, वांंगी लागवड करून अंतर्गत उत्पादन केले जाते परंतु ३ जून रोजी झालेल्यानिसर्गचक्रीवादळाने वेलवर्गीय भाजीपाल्याची बियाण्याची काही उगवण झाली तर काही बियाणे उगवण झाली नाही तसेच उगवण झालेल्या बियाणे व भात रोपांना आतासाठलेल्या डबक्यातून पंपाने पाणी देण्याची वेळ आली आहे. यंदाचांगला पाऊसअसल्याचे वेधशाळेकडून सांगण्यात आले होते पण अंदाज फोल ठरलाआहे. त्याच प्रमाणे यंदा मृगनक्षत्रात चांगला दोन दिवस पाऊस पडुन नद्या नाल्याना थोडे पाणी आले. शेतकरी बियाणे व खते खरेदी करून गेल्या चार वर्षांत पहिल्यादाच दुबार पेरणी झाली.शासनाने शेताच्या बांधावर खत,बि बियाणे दिले पण त्यात काही  कंपन्यांचे भाताचे बियाणे रूजले नाही तर ३० % शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ आली असून सलग पंधरा दिवसा पासून पावसाने विश्रांती घेतली आहे त्यामध्ये सतत उन्हाचा तडाखा वाढल्याने ओलावा पाच ते सहा इंच च्या खाली गेल्यामुळे वेलवर्गीय भाजीपाला व भात रोपे कोमजून चालले आहेत ज्या शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध आहे असे शेतकरी मशिनद्वारे पाणी देत आहेतवज्याशेतकऱ्यांनी डोगर भागात लागवड केली आहे असे शेतकरी १ ते २ मैल अंतरावरून पाणी घेऊन जात पिकांना पाणी देऊन पीक वाचवण्याचा प्रयत्नकरीतआहेत.बळीराजा वर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.शेतकरी हा अर्थ व्यवस्थेचा कणा समजला जातो. पण त्याचाच कणा मोडला गेला असून परिस्थितीशी जुळवून घेऊन जीवन जगत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा