"निसर्ग"चक्रीवादळात छप्पर गमावलेल्यांंना, विश्व हिंदू परिषदेने छ्प्पर दिले !



तळा (किशोर पितळे)
३जून रोजी झालेल्यामहाभयंकर " निसर्ग " चक्रीवादळाने हजारो बांधवांचे संसार उध्वस्त झाले.असंख्य घरांची छप्परे नष्ट झाली.तर काहिंची घरे जमीनदोस्त झाली.निवारा शिल्लक राहिला नाही. क्षणात होत्याचे नव्हते झाले.अनेक जण बेघर झाले अतीशय दयनीय अवस्था झाली. आजूनही
या प्रसंगातून सावरलेली नाहीत. कोरोना बरोबर चक्रीवादळाचे संकट लाँकडाऊन मुळे हाताला काम नाही आर्थिक घडी विस्कटून गेली निवाऱ्याची गरज कशी भागणार या विवंचनेत अनेक गरीब कुटुंब हतबल झाली असतानाच अनेक मदतीचे हात कोकण वासीय मदत करीत असतात पण गरीबांचीसाठी विश्व हिंदू परीषद पुढे सरसावून तळा तालुक्यातील गरीब, दुबळ्या बांधवाना त्यांची घरे परत उभी करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेकडून ३० जून आणि १ जुलै रोजी  सिमेंट पत्र्यांचे वाटप करण्यात आले. विश्व हिंदू परिषदेच्या या सेवा कार्यामुळे खांबोली बौद्धवाडी, खांबोली आदिवासीवाडी, बोरभाटला आदिवासी वाडी, तारणे, तळा - रोहिदास आळी, बाजार पेठ, मुंढ्याची वाडी, परीट आळी, भोईरवाडी,कुंभार आळी, टोकार्डे, गिरणे, मेढे, वाली, जाधववाडी व हार्डी या गावातील 90 कुटुंबाना लाभ मिळाला.हिंदू समाजाच्या हितासाठी झटणारी विश्व हिंदू परिषद, हिंदू समाजाच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध आहे,लाँकडाऊन मध्ये गरजू 
गरीबांना अन्न धान्य वाटप करून भुकेलेल्याची भुक भागवली.शहरासह ग्रामीण भागात देखील केले.
आपल्या बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला पाहिजे असे रायगड जिल्हा मंत्री श्री. राहुल तळकर यांनी सांगितले.या सेवा कार्यात तळा प्रखंड मंत्री गणेशजी मानकर, बजरंग दल संयोजक विशाल कदम, सहसंयोजक भरतजी तळकर, गोरक्षा प्रमुख अंकित खेडेकर, सुधाकर कळंबे, विशाल लाड , राजु जाधव यांनी विशेष मेहनत घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा