आधुनिक शिक्षणातील परिवर्तन अंगीकृत करा

आधुनिक शिक्षणातील परिवर्तन अंगीकृत करा ; पालकांची भूमिका निर्णायक

 श्रीवर्धन संतोष सापते

 व्यक्ती विकासामध्ये शिक्षणाची भूमिका अतिशय महत्त्वाची व निर्णायक असते. शिक्षण हे व्यक्तिमत्वाला विविध पैलू निर्माण करण्याचे महत्त्वाचे साधन मानले जाते. भारतीय समाजमन प्रगल्भ, जागृत, संवेदनशील, व सजग बनवण्याचे काम शिक्षणा ने आजपर्यंत केलेले आहे. काळानुरूप शिक्षण पद्धतीमध्ये वेळोवेळी बदल घडत आलेले आहेत. घडलेल्या बदलांचा स्वीकार करून त्याद्वारे अध्ययन व अध्यापन प्रगल्भ करण्याचं काम शिक्षक रुपी गुरुजनांनी अतिशय सुंदर पद्धतीने केलेले आहे. आजमितीस पुन्हा एकदा शिक्षणाच्या नव्या  अध्याय यास सुरुवात होत आहे. कोरोना मुळे शिक्षण पद्धतीमध्ये निश्चितच काही निर्णय बदल घडणार आहेत आगामी काळामध्ये विद्यार्थी व शिक्षक यांच्यामधील अंतर वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अशा प्रसंगी शिक्षणाविषयी धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे. कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण हा पर्याय एकमेव आहे असे निश्चितच नाही. शिक्षणाविषयी विविध मार्ग, पर्याय आजही उपलब्ध होऊ शकतात त्या नुसार जागृत पालकाने पुढाकार घेणे अगत्याचे आहे. कारण आज प्रत्येक घरातील शिक्षित आणि सुशिक्षित वर्गाची संख्या निश्चितच वाढलेली आहे.  कोरोना मुळे घरात एक तरी व्यक्ती मुलांच्या नियमित सानिध्यात राहू शकतात घरात आई,  बाबा, दादा कुणीतरी एक व्यक्ती घरात जर वेळ काढू शकला तर मुलांचे शिक्षण निश्चितच सुरळीतपणे चालू शकते. नाही तर तसं पण खाजगी शिकवणी ला फक्त मुलांना रट्टा मारायला,  घोकंमपट्टी  करायला शिकवलं जातं ते निदर्शनात आलेला आहे. आज  जवळपास सर्व शालेय पाठ्यपुस्तके बाजारात उपलब्ध झालेली आहेत. त्यानुसार पालकाने पुस्तक खरेदी करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला सुरुवात करणे गरजेचे आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य होईल असे वाटत नाही, नेटवर्क मधील अडचणी, घरातील आर्थिक गणित आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचा शिक्षणा मधील उत्साह आवश्यक आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्याला मोकळं वातावरण, समवयस्क मित्र, प्रशिक्षित व मनमिळावू शिक्षक वर्ग या सर्व बाबी उपलब्ध असतात. तसेच अध्ययन व अध्यापन करत असताना शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील संवाद हा शिक्षणासाठी निर्णायक असतो. ऑनलाइन शिक्षणामध्ये हा संवाद खंडित होण्याची दाट शक्यता आहेत. अगोदर कोरोनाचे संकट व आत्ता चक्रीवादळाचे संकट या दोन्ही बाबींमुळे रायगड जिल्ह्यातील  शिक्षणासाठी राज्य सरकारला विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.

 माझा मुलगा  इयत्ता नववीच्या वर्गात आहे. तो अभ्यासासाठी मोबाईल घेऊन बसतो मात्र थोड्या वेळातच त्याचे लक्ष विचलित होऊन तो मोबाईल मधील इतर ॲप्स चालू करतो त्यामुळे मी  व माझी पत्नी नियमित जवळपास दोन तास बसून त्याच्याकडून पाठ्यपुस्तकातील दोन दोन प्रकरणे वाचून घेतो व नंतर त्याला समजावून सांगतो.... संदीप आव्हाड ( पालक श्रीवर्धन )

 सद्यस्थितीत कोरोनामुळे शिक्षणात अनेक बदल होणार आहेत त्यानुसार विद्यार्थ्याचे हित जोपासण्याचे आमचे दायित्व असेल त्यानुसार आम्ही आमचे दायित्व पूर्ण करणार आहोत. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. याची पुरेपूर काळजी घेऊ.... घनश्याम गायकवाड ( शिक्षक श्रीवर्धन नगरपरिषद)

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा