गेले महीनाभर "जोरदार सुरु असणारे म्हसळा होणार लॉक डाऊन अगेन" ?

फोटो : नियमांचे उल्लंघन करून बाजारांत होत असलेली गर्दी

म्हसळ्यात आरोग्य यंत्रणेचा कर्मचारी कोरोना पाझीटीव्ह

गेले महीनाभर "जोरदार सुरु असणारे म्हसळा होणार लॉक डाऊन अगेन" जनता कर्फ्यूची अनधिकृत घोषणा

संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा शहरांतील ग्रामिण रुगणालयांतील एक कर्मचारी आज कोरोना पाझीटीव्ह निघाल्यामुळे म्हसळ्यात अचानक व्हाटशॉपची चक्रे फिरायला लागली व पुन्हा चर्चेला उधाण आणि उपाय एकच जनता कर्फ्यू.दोन दिवसा पूर्वी लिपणीवावे येथील रुग्ण पॉझीटीव्ह सापडला तो मुंबई भेंडीबाजार परिसरांत रहाणारा ३४ वर्षीय तरुण होता.आज म्हसळा शहरांत सापडलेला रुग्ण हा सुद्धा तरुण व आरोग्य विभागा तील आहे. त्यामुळे भविष्यात म्हसळा कोरोनाचे सेंटर (HotSpot)ठरेल का अशी भीती वाटत आहे.कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून उद्या गुरुवार दि.२ जुलै ते ५ जुलैपर्यंत जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. या जनता कर्फ्यू मध्ये फक्त दुधाची दुकाने सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत आणि मेडिकल स्टोअर्स, दवाखाने दिवसभर उघडी राहतील. याबाबत अधीकृत प्रेस नोट देण्यास टाळाटाळ होत आहे.

प्रशासनात ताळमेळ नाही. 
तालुक्यातील कोरोना नियंत्रण कक्ष हे " निर्सग चक्रीवादळ व नैसर्गिक आपत्ती कक्षात वर्ग झाल्यामुळे कोरोनाची सद्यस्थिती काय याची अधिकृत प्रसिध्दी, नियंत्रण व कार्यवाही प्रशासकीय माध्यमातून होत नाही अशा सततच्या तक्रारी असूनही योग्य ती दखल वरीष्ठ प्रशासनाकडून घेतली जात नाही.राज्य सरकारने मिशन बिगीन अगेन सुरु केले असताना कोरोनाबाबत नियमांचे पालन करायचे का जुना जनता कर्फ्यूचा मार्ग पकडायचा असा सवाल होत आहे.
४जूनपासून आज १ जुलै पर्यंत म्हसळा बाजारपेठेत ग्राहक व व्यापारी निर्सग चक्रीवादळात कोरोना गेला याच भावनेने प्रशासन व नागरिकानी सोशल डीस्टंस, मास्क, वाहतुकीचे नियम वाऱ्यावर सोडले ह्या बाबतही उलट- सुलट चर्चा होत आहे.
लोकप्रतिनिधी, प्रशासन व स्थानिक नागरिक करीत आहेत आरोग्याकडे दुर्लक्ष.
तालुक्यात ग्रामिण रुग्णालय, ३ प्राथमिक आरोग्य केंद्र, ९ उपकेंद्र आहेत. ग्रामिण रुग्णालयात गेले सहा वर्ष वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकिय अधिकारी व स्टाफ कमी आहे. म्हसळा प्राथमिक आरोग्य केंद्र गेले ६ वर्ष बंद आहे.आवश्यक तो कर्मचारी वर्ग नाही याकडे वरील सर्वांचे दुर्लक्ष आहे हे म्हसळा करांचे दुर्देव आहे.

"राज्य सरकारने मिशन बिगीन अगेन अंतर्गत सर्व व्यवहार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. संपुर्ण राज्यासाठी हा निर्णय असून केवळ एका जिल्हया किंवा तालुक्यासाठी वेगळा निर्णय घेता येणार नाही. बंदबाबत कोणालाही जबरदस्ती करता येणार नाही ही लढाई करोनाशी आहे, तो न होण्याबाबत नियमांचे काटेकोर पालन करावे बंद करण्यासाठी दादागिरी करू नये असे आदेश राज्याचे पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले असताना जनता कर्फ्यू चे आदेश कोण काढतो यावर प्रशासनाने कारवाई करावी"
कांतीलाल शेठ जैन सामाजिक कार्यकर्ते

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा