खरसई प्रतिनिधी
एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत म्हसळा तालुक्यातील भरत घाणेकर मित्र मंडळ आणि रुक्मिणी घाणेकर परिवारातर्फे याआधी कोरोना आणि आता निसर्ग चक्री वादळाचे संकट अशा दुहेरी नैसर्गिक आपत्तीने हैराण झालेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला आहे. दि.03 जून रोजी झालेल्या चक्री वादळात गावातील बहुतेक घरे उध्वस्त झाली असल्याने अन्नधान्य आणि रोजच्या जीवनावश्यक वस्तू पावसात भिजून गेल्या आहेत त्यामुळे लोकांची उपासमार होऊ लागली आहे.
गोरगरीब नागरिकांच्या गैरसोयी लक्षात घेऊन भरत घाणेकर मित्र मंडळ यांच्या तर्फे १०० हुन अधिक कुटुंबाना कडधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच निराधार महिलांनाही विशेष मदत करण्यात आली.
भरत घाणेकर मित्र मंडळातर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केल्याने नागरिकांनी घाणेकर यांचे आभार मानले.
यावेळी खरसई ग्रामपंचायतचे सरपंच श्री निलेश मांदाडकर, भरत घाणेकर मित्र मंडळातर्फे स्वतः भरत घाणेकर, घाणेकर परिवार तसेच खरसई गावातील चारही समाजाचे अध्यक्ष आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या सगळ्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सोशल डिस्टस्टिंग चे पालन करून करण्यात आले
Post a Comment