जनतेला दिलेली मदत ही महाविकास आघाडी सरकारची आहे.... विनोद घोसाळकर
श्रीवर्धन संतोष सापते
आजमितीस कोकणच्या जनतेवर नैसर्गिक आपत्ती चक्रीवादळाच्या रूपानं आलेली आहे. या आपत्तीचा सामना करण्यासाठी विद्यमान राज्य सरकार सर्व कोकणवासीयांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत असे प्रतिपादन राज्य मंत्री विनोद घोसाळकर यांनी श्रीवर्धन तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद व आढावा बैठकीत केले. विनोद घोसाळकर यांनी आजपर्यंत राज्य सरकारने विविध उपाय योजनांची माहिती दिली चक्रीवादळाने कोकणातील सर्वसामान्य माणसाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहे यापूर्वी च्या सरकारने बाधित लोकांना केलेल्या मदतीपेक्षा विद्यमान सरकारने अतिशय जलद गतीने मदत केलेली आहे. चक्रीवादळात नुकसान झालेल्या सर्व घटकांचा विचार विद्यमान राज्य सरकारने केलेला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी अतिशय दर्जेदार स्वरूपाचं काम करत आहे. वादळात ग्रस्त झालेल्या कोळी समाजाच्या पाठीशी सुद्धा सरकार अतिशय ठामपणे उभे आहे. चक्रीवादळात कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी झालेली नसून त्याचे सर्व श्रेय हे प्रशासकीय यंत्रणेला जाते प्रशासकीय यंत्रणेने चक्रीवादळाच्या प्रसंगी अतिशय चांगल्या स्वरूपाचं काम केलेल आहे. कोरोनामुळे अनेक लोकांचे आर्थिक घडी विस्कटलेली असताना चक्रीवादळाच्या संकटा ने सर्वसामान्य व्यक्तीचे आतोनात हानी झालेली आहे. घर कपडे वस्तू व अन्नधान्य या सर्व बाबींचा विचार विद्यमान सरकारने केलेला आहे कोकणातील पर्यटन आणि शेती पूर्ववत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असे विनोद घोसाळकर यांनी सांगितले. सदरच्या आढावा बैठकीसाठी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल नवगणे तालुकाध्यक्ष प्रतोष कोलथकर, सभापती बाबुराव चोरगे, माजी आमदार तुकाराम सुर्वे नगरसेवक प्रीतम श्रीवर्धन कर, सुजित तांदळेकर व इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment