संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळयातील बळीराजा निर्सग वादळाच्या नुकसानीतून सावरत असतानाच भात रोपे आवण लावणी योग्य झाल्यामुळे पाणथळ भागातील शेतकरी वर्ग लावणीत गुंतला आहे. तालु- क्यात आजपर्यत ५५२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे तालुक्यात २४०० हेक्टर क्षेत्रांत भाताचे पिक घेतले जाते २४० हेक्टर क्षेत्रांत भात आवण तयार केल्याचे सांगण्यात आले. बहुतांश शेतकऱ्यानी रुपाली, जोरदार,रुचिका,अस्मिता, ज्योतिका, वैष्णवी, साईराम, साई, श्रीराम या सुधारीत, सुर्वणा लोकल वाण, लोकनाथ ५०५ संकरीत बियाण्याची लागवड केली आहे.तालुक्यांत बहुतांश भागात नांगरणी नंतर चिखल- णी करून या क्षेत्रात लावणी केली जाते भात रोपांची काढणी झाल्यानंतर पुनर्लागवड हा महत्त्वाचा टप्पा असतो. तालुक्याती
ल खारगाव (खु), तोंडसुरे,आगरवाडा,वरवठणे,बनोटी, रेवली,खरसई, मेंदडी,वारळ,खारगांव (बु),पाभरे या परीसरां परीसरांतील बहुतांश शेतकरीवर्ग लावणीच्या कामात गुंतला आहे. कोकणातील जास्तीत जास्त क्षेत्रावर लावणीद्वारे भातपिकाची लागवड केली जाते.नांगरणी नंतर चिखलणी करून या क्षेत्रात लावणी केली जाते .लावणी करत असताना पावसांत भिजत मनोरंजनासाठी महिला गावाकडची जुनी पारंपरिक गाणी, ओव्या म्हणून भातलावणी करतात. पुरुष मंडळी त्यांना दाद तर देतातच; अन् कधी कधी गाण्याचीही साथ देतात. सकाळ पासून दुपार पर्यंत व दुपारच्या जेवणा नंतर सूर्यास्तापर्यंत पुन्हा हा उपक्रम सुरू असतो.निर्सगचक्री वादळांत प्रंचड प्रमाणांत घरे, फळबागायतींचे नुकसान होऊनही लावणीसाठी चिखलांत उतरलेला कोकणी शेतकरी चाकरमानी ‘अनलॉक 2’ चे स्वागतासाठी आनंदाने लावणीत गुंतला आहे.
"मुंबई, पुण्यात विविध कंपनी सुरु झाल्या आहे. अनेक कर्मचारी कामावर रुजू होत आहेत. मात्र त्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रिक्षा, टॅक्सी गरजेची आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘अनलॉक 2’मध्ये आम्ही मुंबईत नक्कीच लौकर जाणार गावाकडे लावणी करण्याची संधी पण आमचे साठी सोन आहे"
पूनम नाक्ती, शेतकरी
Post a Comment