अंकुश गाणेकर म्हसळा
श्रीवर्धन मतदार संघातील प्रशासन यंत्रणा ही राष्ट्रवादी काँग्रेस च्या दावणीला असल्याचा आरोप दक्षिण रायगड जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी म्हसळा सार्वजनिक वाचनालय येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केला त्यावेळी तालुका प्रमुख महादेव पाटील माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के शहर प्रमुख अनिकेत पानसरे आणि पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री.नवगणे म्हणाले की,३जून रोजी म्हसळा श्रीवर्धन तालुक्यासह कोकणात निसर्ग महा चक्रीवादळाने अनेकांचे संसार उद्धवस्थ झाले अनेकांची घरे पडली त्याची शासन स्तरावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाम श्री उद्धव ठाकरे साहेब यांनी गांभीर्यानी दखल घेऊनतात्काळ१००कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.आणि ती मदत प्रशासन मा. पालकमंत्री यांच्या मार्फत धनादेश वाटप चालू आहे मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री हे हे धनादेश आमच्या पक्षाकडून आणि स्वतः देत असल्याचा आव आणत असून एकाच पक्षाचा अजेंडा मिरवत असल्याचे दिसून येते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. आणि त्या सरकारचे मुख्यमंत्री हेशिवसेनेचे आहेत मात्र रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अदिती तटकरे या जिल्ह्यात आघाडीच्या मित्र पक्षांना डावलून फक्त राष्ट्रवादी पक्षच सर्व करत आहे असे भासविण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यातच कहर म्हणजे नुकताच वादळात झालेल्या नुकसान ग्रस्तांना धान्य वाटप करण्याकरिता मुंबईचे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचेकडून आले त्याचे वाटप हे प्रांत आणि तालुक्याचे तहसीलदार यांचेमार्फत करण्यात येणार होते मात्र प्रशासन हे राष्ट्रवादी पक्षाचे झेंडे मिरवत असल्याने प्रांत आणि तहसीलदार यांनी ते धान्य फक्त राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले मग काय कार्यकर्त्यांनी ते धान्य फक्त राष्ट्रवादी पक्षाच्या ठराविक लोकांना तटकरे साहेब यांनी दिले आहे सांगून देण्यात आले याबाबत आम्ही तहसीलदार यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली यावरून प्रशासन हे राष्ट्रवादी पक्षाच्या दावणीला बांधली असे दिसून येते प्रांत आणि तहसीलदार यांनी नोकरी सोडून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करावा असे ही श्री नवगणे म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले की तटकरे कुटुंब जे धनादेश वाटप करत आहेत ते पक्षाच्या लोकांनाच ती मदत कशी मिळेल याकडे त्यांचा कल आहे याचे पुरावे आमच्याकडे आहेत त्यामुळे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व लोकांना आवाहन करतो की सर्व नुकसान ग्रस्तांना धनादेश आणि धान्य हे ठाकरे सरकार कडून आलेले आहेत आणि त्याच्यावर सर्व नागरिकांचा हक्क आहे तटकरे कुटुंब आणि कार्यकर्ते हे तुमची दिशाभूल करत आहेत त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका अशी विनंती करत आहे
Post a Comment