तळा (किशोर पितळे)
संपूर्ण देशात कोरोना सारख्या महा भयंकर महामारी रोगाने थैमान घातले असुन शहरातून ग्रामीण भागात देखील हातपाय पसरण्यास सुरुवात झाली प्रशासनाने प्रभावी पणेउपाय योजना जनजागृती केली गेलीहोती.परंतु जसजसे लाँकडाऊन वाढत गेल्याने शहरातील चाकरमानी गावाकडे आले आणी प्रादुर्भाव वाड्या वस्ती वर पोहोचला.महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, पं.स.प्रशासन नगरपंचायत प्रशासनाने योग्यअंमलबजावणी प्रत्येक गावात केली त्यामुळे कोरोना रोखण्यास यश मिळाले.तालुक्यात फक्त १४ रूग्णापैकी २चा बळी गेला व बारा रूग्ण कोरोना हरवून घरी परतले गेल्या महीना भरात एकही
रुग्ण नसल्याने कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर असतानाच पुन्हा एंट्री केली असून तालुक्यातील बारपे येथील ४५वर्षीय तरूणाला कोरोनाची लागण झाली आहे. सदर व्यक्तीमालाड मुंबई येथून१३जून रोजी खाजगी वाहनाने घरी आला होता सर्वांना होम क्वाँरंटाईन करण्यात आले होते त्यानंतर लक्षणे जाणवू लागल्याने२२जून रोजी इंदापूर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी गेला होता व लगेचच उपजिल्हा रुग्णालय क्वाँरंटाईन करण्यात आले असून स्वँब जे.जे.हाँँस्पिटल कोविंड कक्षात पाठवण्यात आले असता रिपोर्ट २२जून रोजी पाँझिटीव्ह आला असून संपर्कातील चौघांना होम क्वाँरंटाईन करण्यात आले आहे.पोलीस बंंदोबस्तकरण्यात आला आहे
अशी माहिती तळातहसीलकार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.जिल्ह्यात तळा तालुक्यात त्या मानाने कोरोना रूग्णाचे प्रमाण अगदी नगण्य आहे त्यामुळे जवळजवळ कोरोना मुक्त झाला होता.आता मात्र तालुक्यातील सर्वांच्या चिंतेत वाढ झालीआहे.अजूनही या कोरोनारोखण्यासाठी प्रभावीपणे स्वताःहून प्रयत्न करणे आवश्यक आहे.शहरात येणारे ग्राहक सोशल डिस्टंट पाळत नाहीत बाजारात येण्यासाठी रिक्षा मिनीडोअरचा वापर करीत असून गांभीर्याने घेत नाहीत.लाँकडाऊन व संचारबंदी शिथिल केल्याने वैयक्तिक स्व संरक्षणाचे नियम शिथील केले आहेत मास्कचा वापर करीत नाही असे निदर्शनास येत आहे स्वतःबरोबर दुसऱ्यांची पण काळजी घ्या जबाबदारीने काळजी घेणे गरजेचे आहे. असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.
Post a Comment