संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
प्रतिकुल हवामानात पिकांच्या होणाऱया नुकसानीत शेतकऱयांना विम्याचे संरक्षण मिळावे, यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत हवामानावर आधारित फळपिक विमा योजना 2019 शासनाने जाहीर केली आहे तालुक्यातील प्रत्येक बागायतदारानी आंबा व काजू पिकाचा विमा उतरविणे शेतकऱ्याचे दृष्टीने फायद्याचे आसल्याचे म्हसळा तालुक्याचे (प्र) कृषी अधिकारी ज्ञानदेव अनाप यानी आढावा बैठकीत सांगितले. म्हसळा तालुक्यात आंबा पिकाखाली १८७९ हेक्टर व काजू पिकाखाली ७६९ क्षेत्र आसल्याचेअनाप यानी सांगितले.या योजनेत तापमान, पाऊस, आर्द्रता, गारपीट व वेगाचे वारे या हवामानाच्या धोक्यामुळे होणाऱ्या नुकसानी 'पासून वरील पिकांना विमा संरक्षण मिळणार आहे. सदर योजना पिकाखालील क्षेत्राशी निगडित असून योजनेंतर्गत आंबा व काजू पिक विमा उतरविण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०१९ आहे. काजू पिकासाठी हेक्टरी ४२५० रु. व आंबा पिकासाठी हेक्टरी ६०५० रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे. शिवाय गारपिटीसाठी सुद्धा जादा विमा हप्ता भरून शेतकरी विमा संरक्षित होऊ शकतात.योजनेत कुळाने, भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी विविध वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले असतील अशा सर्व शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची असून, बिगर कर्जदारांना ऐच्छिक असणार आहे या वर्षीचे हवामान बदल विचारात घेता तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी सभासदांनी तसेच आंबा व काजू बागायतदारांनी या वर्षी विमा हप्ता रक्कम भरुन विमा संरक्षित व्हावे असे तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव अनाप यानी सांगितले.
Post a Comment