राम जन्मभूमी बाबरी मस्जीद वादावरील निर्णय : म्हसळयात रुटमार्च


संजय खांबेटे  म्हसळा प्रतिनिधी 
राम जन्मभूमी बाबरी मस्जीद वादावर कधीही निकाल जाहीर होऊ शकतो, या पार्श्‍वभूमीवर देशात शांतता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत असतानाच राज्याचे गृह विभागाने राज्यात ,जिल्ह्यांत व प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दींत शांततेचे अवाहन केले आहे, त्याच अनुषंगाने श्रीवर्धनचे उप विभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा शहरांत रुट मार्च काढण्यात आला, यामध्ये म्हसळा पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर ,श्रीवर्धन पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, दिघी सागरीचे सपोनी महेंद्र शेलार, पोऊनी शेख, एस्.आर.पी.स्ट्राईकींग फोर्स,आर.सी.पी. स्थानिक व श्रीवर्धन आणि दिघी सागरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी असे ८० कर्मचारी रुटमार्च मध्ये सामिल होते.

"निकालानंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी, राज्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून गृह विभागाने दिलेल्या निर्देशा नुसार हा रुट मार्च आहे "
बापूसाहेब पवार ,उप विभागीय पोलीस अधिकारी. श्रीवर्धन

निकालाचे कालावधीत कोणत्याही अफवाना नागरिकानी बळी पडू नये , अफवा पसरवू नये कोणतीही शंका आली तरी म्हसळा पोलीस स्टेशनचा संर्पक फोन नं०२१४९ -२३२२४० या क्रमांकावर फोन करून चौकशी करावी"
अश्वनाथ खेडकर, पोलीस निरीक्षक, म्हसळा.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा