पुण्यातील तरुणाईची निसर्ग संवर्धनाची हाक ; 1000 किमी ची सायकल स्वारी : कोकणातील तरुणाई ने गावी यावे ही स्थानिकांची साद
श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
देशातील तरुणाईच्या कृतीवर देशाचे भवितव्य अवलंबून असते .सुजाण व कर्तव्य दक्ष तरुण आपल्या विविध कृती द्वारे समाजाचे ऋण सदैव फेडत असतात .देशा प्रती असलेले कर्तव्य पार पाडण्यात तरुण पिढी अग्रणी आहे .त्याचे उत्तम उदाहरण पुण्यातील चार तरुणांनी सायकल स्वारी द्वारे अधोरेखित केले आहे .
सायकल प्रेमीं ग्रुप (पुणे) तर्फे दर वर्षी दिवाळीच्या सुट्टी मध्ये सायकल यात्राचे आयोजन केले जाते. हे सायकल यात्रेचे तिसरे वर्ष आहे. पहिला वर्षी पुणे - अहमदनगर- पुणे असा 300 किमी चा प्रवास वाहतुकीचे नियम पालन व अपघातग्रस्तना मदत ह्या विषयी जनजागृती केली होती. दुसरी सायकल यात्रामध्ये अवयवदान जन जागृतीसाठी पुणे- चंद्रपूर असा सायकल यात्रा केली होती ही सायकल यात्रा साधारण 1100 किमी केली. या वर्षी किसन ताकमोडे , राजेंद्र सोनवणे , सतीश ठाकरे , व गणेश मुसळे या सर्व मित्रांनी एकत्र येऊन कोकण सायकल यात्रा मोहीम सुरू केली आहे. ही सायकल यात्रा 11 दिवसाची,व 1000 किमी ची आहे . सायकल यात्रामध्ये पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन ह्याविषयी जन जागृती करत आहेत . प्रवास मार्ग पुणे- महड - रायगड- महाड- हरिहरेश्वर - दापोली - गुहागर- गणपतीपुळे- चिपळूण - महाबळेश्वर- वाई - पुणे असा मार्ग आहे. ह्या प्रवासामध्ये सर्वसामान्य व्यक्ती , सामाजिक संस्था , शैक्षणिक संस्था, इ. ठिकाणी तरुण भेट देत आहेत .
सायकल यात्रा करण्यामागील उद्देश हा आहे की दर वर्षी दिवाळीच्या सुट्टी चा सदउपयोग व्हावा. सर्व समावेशक विषयी घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यत जनजागृती करून त्यानुसार कृतिशील बनवणे हा आहे त्याच बरोबर निसर्ग परिसर , आपला भोवतीचा परिसर पाहणे व समाजातील प्रश्न समजवून घेऊन त्या दृष्टीने काही तरी कृतिशील उपाययोजना तयार करणे , असंख्य गोष्टी आपणांस शिकायला मिळतात. ही अनुभवाची शिदोरी आयुष्यभर जीवन जगण्यासाठी कायम प्रेरणा देत राहणार आहे.असे सायकल किसन ताकमोडे यांनी सांगितले .
आपण सर्वांनी निसर्गाची अतोनात हनी करीत आहोत. पर्यावरनाचे संतुलन कायम बिघडत असलेले दिसून येत आहे त्याचा परिमाण सर्व घटकांवर होत असलेला दिसून येत आहे. आपण सर्वांनी पर्यावरणाचे भान जपले पाहिजे असे राजेंद्र सोनवणे यांनी सांगितले .
सदरचे सायकल स्वार हरिहरेश्वर येथे पोहचल्या नंतर सुयोग लांगी यांनी त्यांच्या शी चर्चा केली असता कोकणातील तरुणांना गावा कडे चला या हा संदेश आपण आपल्या पुढील भ्रमंतीत द्यावा असे सांगितले .सायकल स्वारांना हरिहरेश्वर मधील जनतेने योग्य सहकार्य करत पुढील मोहिमे साठी शुभेच्छा दिल्या .
Post a Comment