संग्रहित छायाचित्र
बोली पंचतन : अभय पाटील
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी खाडीमध्ये सुरु असलेले दिघी पोर्टकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सध्या जोरदार प्रगती पथावर आहे . परंतु वेळास ते दिघी हा सुमारे ७ किलोमीटरच्या मार्गाची मागील ६ वर्षांपासून प्रशासनाने हा नवीन रस्ता होईल , या कारणाने कोणतीही मजबूत डागडूजी केली नसल्याने शिवाय या मार्गावरून नेहमी दिघी पोर्ट मधील मालाची वाहतूक करणाऱ्या अति अवजड वाहतुकीच्या तर रस्त्यामध्ये खडड्यांचेच वास्तव्य असल्याने सध्या वेळास ते दिघी मार्गावरून प्रवास करताना नागरीकांना व वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच नेहमी प्रवास करावा लागत आहे . हा मार्ग नवीन काँक्रीटीकरण होईल पण त्या आधी यामार्गा मध्ये ३ किलोमीटरचा भाग हा वनखात्याच्या लालफितीमध्ये अडकला असल्याने मार्गाचे काम अद्याप सुरूच झालेले नाही . रस्त्याची अवस्था कोणत्याही प्रकारची तात्पुरती डागडुजी करता येत नसल्याने हा मार्ग आता प्रशासनाने बंद करण्याची उपरोधिक मागणी होत आहे . दिघी पोर्ट जरी विकासाचे दार ठोठावत असली तरी रस्त्याची स्थिती पाहता जनतेचे हाल केव्हा थांबणार असा संतप्त सवाल नागरिक व प्रवाशांमधून होत आहे . दिघी पोर्ट कडे जाणाऱ्या माणगाव - साई - म्हसळा - मेंदडी - वडवली - वेळास - कुडगाव - दिघी हा ५५ किलोमीटर लांबीचा रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम जोमाने सुरु आहे . यातील अंदाजे ३० किलोमीटरचा रस्त्याचे काम अंतिम टप्प्या मध्ये आहे तर काही भागामध्ये कामाला अद्याप सुरुवातही झालेली नाही . यामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील वेळास - कडगाव - दिघी या सुमारे ७ किमी मार्गाच्या कामाला कोणत्याही प्रकारे सरुवात झालेली नाही मागील ६ वर्षांपासून हा नवीन रस्ता होईल या आशेने महाराष्ट्र रस्ये विकास महामंडळाने या रस्त्याच्या डागडुजीकडे देखील डोळ्यावर पट्टी बांधल्याप्रमाणे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे .
वेळास - दिघी वनखात्याच्या अखत्यारीतील ३ किमी वरील भागाची परवानगी घेण्याचे काम सुरु आहे पुढील १५ दिवसांमध्ये ही परवानगी मिळेल शिवाय अन्य भागातीलही परवानगी मिळविणेची प्रक्रिया सुरु आहे व परवानगी मिळाल्यावर कामास सुरुवात होईल तत्पुर्वी या रस्त्याच्या डागडुजीसाठी देखील निधीची मागणी करणार आहोत . सचिन निफाडे , कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ
Post a Comment