श्रीवर्धन प्रतिनिधी
या वर्षी सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला असला तरी काही क्षेत्रामध्ये पर्जन्यमान अल्प झाले आहे . अशा भागात येत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता विचारात घेता २०१९ - २० साठी संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्याचे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत . त्यानुसार गुरुवारी ( ता . २१ ) पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यासाठी बैठक बोलावली होती . श्रीवर्धन तालुका पंचायत समितीच्या नानासाहेब धर्माधिकारी हॉलमध्ये तालुक्यातील सर्व सरपंच , ग्रामसेवक , कृषी अधिकारी , कृषी सहायक यांना गावनिहाय आराखडे तयार करण्यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले . सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या त्याचप्रमाणे पूर्वीच्या विहिरीतील भूजल पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावे , वाड्यामध्ये तसेच नागरी क्षेत्रात आवश्यकतेनुसार स्थानिक परिस्थिती व स्रोतांचा विचार करून टंचाईबाबत योग्य उपाययोजना कराव्यात . पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना ग्रामस्तरावर राबवण्यात याव्यात . पाणी व स्वच्छता विभागाने दिलेल्या सूचनांनुसार भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमधील वरिष्ठ भूवैज्ञानिक , सहायक भूवैज्ञानिक , कनिष्ठ भूवैज्ञानिक यांनी संभाव्य टंचाईग्रस्त पाणलोट क्षेत्रनिहाय वगावनिहाय आराखडे तयार करण्याची कामे प्राधान्यक्रमाने हाती घ्यावीत . सभेला जिल्हा परिषद सदस्य सायली तोंडलेकर , सभापती मीना गाणेकर , उपसभापती बाबूराव चोरगे , सदस्य प्रगती अदावडे , कोमनाक तालुका कृषी अधिकारी , कृषी सहायक तालुक्यातील सर्व सरपंच , ग्रामसेवक उपस्थित होते.
Post a Comment