श्रीवर्धन प्रतिनिधी : संतोष सापते
देशाच्या सुरक्षततेत सागरी किनाऱ्याचे महत्व अनन्य साधारण आहे. रायगड जिल्ह्याला मोठ्या स्वरूपात सागर किनारा लाभलेला आहे. रायगडच्या लगतच मुंबई असल्याकारणे रायगड जिल्हा संवेदनशील मानला जातो. बुधवारी श्रीवर्धन तालुक्यातील सर्व ठिकाणच्या सागरी किनाऱ्यावर पोलिसांची गस्त असल्याचे दिसून आले. श्रीवर्धन मधील बागमांडला, हरेश्वर, मारळ, कुरवडे, जीवनाबंदर, आरावी, शेखार्डी, भरडखोल, दिवेआगार, आदगाव, वेळास, सर्वां, नानवेल व दिघी या ठिकाणावर शस्त्रधारी पोलिसदल सज्ज होते. सागरी किनाऱ्याच्या भागामध्ये वस्ती करणाऱ्या जनतेस सुरक्षा व राष्ट्राप्रति असलेली जबाबदारी, कर्तव्य यामध्ये जागृती निर्माण करण्याच्या हेतूने पोलिसदलाने सर्वत्र प्रबोधन केले. देशाच्या भुसेना व वायुसेना सोबतच नाविकसेनेचे महत्व अनन्य साधारण आहे. नौसेनेच्या विविध उपक्रमाला स्थानिक पोलिसांचे साहाय्य सदैव असते. सागरी किनाऱ्याच्या भागामध्ये वस्ती करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने दक्ष असल्यास होणारा कुठलाही चुकीची घटना, गैरकृत्य टाळलं जाऊ शकत. त्याकारणे स्थानिकांच्या मनामध्ये निर्भयता निर्माण करण्यासाठी सागरी सुरक्षा कवच्याची मोहीम राबविण्यात आली आहे. सदरच्या मोहिमेसाठी 10 अधिकारी व 72 कर्मचारी पोलीस प्रशासनाने तैनात केले होते.
सागरी सुरक्षा कवच्यासाठी सागरी सुरक्षा दल व कोळी समाज बांधवानी सदरच्या सागरी सुरक्षा कवच मोहिमेमध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आहे.
सदर मोहिमेचा उद्देश सागरी किनाऱ्याच्या सुरक्षततेत वाढ व्हावी व जनतेचे सहकार्य सुरक्षा व्यवस्थेत मिळावे हे आहे...... प्रमोद बाबर (पोलीस निरीक्षक श्रीवर्धन )
Post a Comment