गौरगावचा सुपुत्र जीवन संघर्षकार नवनाथ रणखांबे यांना राष्ट्रीय 'साहित्यरत्न' पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
सरदार रणजितसिंह सचदेव फाऊंडेशन, मुंबई व साईमोह बहुउद्देशीय प्रतिष्ठान शिर्डी यांच्या वतीने युवा कवी/लेखक नवनाथ रणखांबे  यांना राष्ट्रीय 'साहित्य रत्न' पुरस्कार    भारतीय सेनेचे पूर्व उप -  सेनापती     लेप्टनंट   जनरल गुरमीत  सिंग ,   पद्मश्री डॉ.विजयकुमार शहा, आयोजक  क्रांती महाजन, संमेलनाध्यक्ष राम  गायकवाड, शिर्डी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अर्चनाताई गोते यांच्या हस्ते
बारावे अखिल भारतीय प्रतिभा संमेलन रविवार दिनांक १७ नोहेंबर २०१९ रोजी साई निम ट्री होटेल रुई शिव रोड शिर्डी जिल्हा अहमदनगर येथे दुपारी १ वाजता  प्रदान करण्यात आला .
        विविध क्षेत्रातील प्रतिभावंताना, उल्लेखनीय काम करणाऱ्यांना विविध पुरस्कारने गौरवण्यात यावेळी आले असून यावर्षी युवा कवी /लेखक नवनाथ रणखांबे यांना देखील हा मान मिळाला आहे. 
         कवी /लेखक नवनाथ रणखांबे हे गौरगावचे सुपुत्र असून ते कला साहित्य  सांस्कृतिक, शैक्षणिक, कामगार,सामाजिक इ.विविध क्षेत्रात  उल्लेखनीय कार्य  करीत आहेत. त्यांनी विविध कवी संमेलनाचे आणि  विविध साहित्य संमेलनाचे  आयोजन केले आहे.  "शाहू फुले आंबेडकर",  साहित्य वैचारिक चळवळीत  नवोदित आणि जेष्ठांना विचार पिठ उपलब्ध करून देण्याचा सतत प्रयत्न करीत असतात. जीवन संघर्षकार नवनाथ रणखांबे यांनी 
काही  वैचारिक आणि प्रबोधनात्मक   कवी संमेलनात  अध्यक्ष पद भूषवले असून आंबेडकरी राज्यस्तरीय  साहित्य संमेलनात परिसंवादचे अध्यक्ष पद ही भूषवले आहे. त्यांनी साहित्य  संमेलनामध्ये  सुत्रसंचालक म्हणून धुरा सांभाळली आहे.
'जीवन संघर्ष' हा त्यांचा कविता संग्रह गाजत आहे. त्यांच्या जीवन संघर्ष पुस्तकांची इंडिया टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये ऐतिहासिक नोंद झाली आहे. विविध विषयांवर आधारित त्यांचे लिखाण असून  लेखणीच्या माध्यमातून ते जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत असतात. हरहुन्नरी कार्यकर्ता म्हणून ते विविध क्षेत्रात कार्य करीत आहेत. महाराष्ट्राबाहेर ही त्यांच्या कार्यामुळे जनमानसात त्यांची एक ओळख निर्माण होत आहे.
          जीवन संघर्षकार नवनाथ रणखांबे यांना राष्ट्रीय 'साहित्यरत्न' पुरस्कार प्रदान झाल्यामुळे अजित  खराडे , नंदकुमार खराडे, डॉ.कुलदिप कदम,रवी माने, प्रशांत खराडे,  विजय खराडे, इ. त्यांचे अभिनंदन केले आहे. जीवन संघर्षकार नवनाथ रणखांबे यांना मानाचा राष्ट्रीय 'साहित्य रत्न 'पुरस्कार प्रदान झाल्यामुळे विविध माध्यमातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव  होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा