भारतीय नौसेना व श्रीवर्धन पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी सुरक्षेसाठी चर्चा सत्र आयोजित


प्रत्येक भारतीयांच्या सुरक्षेसाठी भारतीय सेना सज्ज - सलमान खान (लेफ्टनंट कमांडर )

श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते

देशातील प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेचे दायित्व भारतीय सेनेचे आहे .सागरी सुरक्षेसाठी जनतेने नियमाचे पालन करत नौसेनेला सहकार्य करावे .आपणा सर्वांच्या दक्षतेमुळे देशाच्या विविध भागांतील सागरी सीमा बळकट झाल्या आहेत असे प्रतिपादन लेफ्टनंट कमांडर सलमान खान यांनी केले .
श्रीवर्धन पोलीस व भारतीय नौसेना यांच्या संयुक्तिक" सागरी सुरक्षे "संदर्भात चर्चा सत्राचे आयोजन शेखार्डी येथे करण्यात आले होते .सलमान खान यांनी सदर प्रसंगी उपस्थित जनसमुदायाशी मुक्तपणे संवाद साधला .सागरी सुरक्षतेतील जनतेच्या भूमिकेचे महत्व , जनतेच्या अडी अडचणी व समस्या ,नौसेनेचे दायित्व ,नौसेनेचे कार्यपद्धती ,दहशती हल्ले आणि सामान्य व्यक्ती या विषयी सलमान खान यांनी मार्मिक मार्गदर्शन केले .सलमान खान यांनी म्हटले सागरी सुरक्षेसाठी आपण सर्वांनी सदैव सतर्क असणे अगत्याचे आहे .सागरी मार्गावर आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे त्याचा फायदा आपण आपल्या सुरक्षेसाठी करा .आपल्या सागरी हद्दीत कुठेही अपरिचित बोट अथवा जहाज आढळल्यास तात्काळ नौसेना , स्थानिक पोलीस ठाणे व सागरी सुरक्षा रक्षकांना त्यांची कल्पना द्या .आपल्या हद्दीत इतर परकीय घटकांची घुसखोरी आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे .असे खान यांनी सांगितले .नौसेनेला सामान्य माणसाची मदत मिळाल्यास कोणताही अनुचित प्रकार कदापि घडणार नाही .सागरी भागातील प्रत्येक मच्छीमार देशाचा सैनिक आहे .आपल्याला प्रत्येक देशबांधवांच्या जीवाचे मोल जपायचे आहे .भारतीय सेना देशातील प्रत्येक घटकांच्या सुरक्षेसाठी सज्ज आहे असे सलमान खान यांनी सांगितले .सदर कार्यक्रम प्रसंगी श्रीवर्धन पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी उपस्थित जनतेस सहकार्याचे आव्हान केले .या चर्चा सत्रात नौसेनेचे सुमित कुमार , श्री अवणीत तसेच श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे जयेंद्र पेडवी ,उपपोलिस निरीक्षक एच एल पाटील ( नौका विभाग   )आणि ओ एन जी सी चे स्वप्नील ठाकूर व शेखार्डी ,आरावी ,कोंडविल ,व भरडखोल येथील नागरिक उपस्थित होते .


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा