दांडगुरी : श्रीकांत शेलार
रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराकडे मोठ्या आशेने येथील जनता पाहत आली आहे . बंदराच्या विकासामुळे येथील जनतेचे राहणीमान उंचावेल , रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील मात्र गेली अनेक वर्षे हे फोल ठरत आहे . विकासक विजय कलंत्री यांच्या बंदर विकासाच्या नियोजनाच्या अभावामुळे अद्यापही दिघी पोर्टचा विकास झाला नाही . शिवछत्रपतींची कर्मभुमी रायगड दक्षिण काशी हरिहरेश्वर , श्रीमंत पेशव्यांची जन्मभूमी श्रीवर्धन , सुवर्णगणपती प्रकटस्थान दिवेआगर अशी वजनदार पर्यटनस्थळे असतानाही दक्षिण रायगडचे युवक युवती रोजगारासाठी मोठ्या संख्येने प्रतिवर्षी शहराकडे स्थलांतरित होताहेत . शहरांमध्ये निवारा विकत घेण्यासाठी कोकणातल्या शेकडो एकर जमिनी प्रतिवर्षी परप्रांतीयांना विकल्या जाताहेत .
विकसकावर कारवाईची मागणी...
गेल्या १५ वर्षांत दिघी पोर्टचा १० % क्षमता वापरही ही सुरु झालेला नाही . त्यामुळे इथला रोजगार आणी एकंदर जिवनमानातील सुधारणाही रखडल्या पण एकाही लोकप्रतिनिधी ने या प्रश्नं विधिमंडळ वा लोकसभा , राज्य सभेत दुसरा विकासक मिळावा यासाठी प्रश्न उपस्थित केले नाहीत . परजिल्ह्यातील कृषी कर्जमाफी आणी अन्य प्रश्नावर कोकणचे आमदार आक्रमक होतात प्रत्यक्षात कोकणातील शेतकच्यांची कर्जमाफी अत्यल्प आहे .
सरकारी दवाखान्यात डॉक्टरांची अनेक पद रिक्त...
सरकारी दवाखान्यात डॉक्टरांची अनेक पद रिक्त आहेत , खाजगी तज्ञ डॉक्टरांची सुविधांची वानवा आहे . रूग्णांना मुंबई पुण्यात हलवाव लागतय . दर्जेदार प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक शाळ , महाविद्यालयांची उणीव आहे . या सर्व समस्या दिघी पोर्टमुळे निकाली निघतील अशी माफक अपेक्षा होती . पोर्टच्या दिवाळखोरीने सगळ्या आशा आकांक्षा वर पाणी पडल आहे . आयात निर्यात , मालवाहतूक , गोदाम , प्रक्रिया उद्योग , पॅकेजिंग फॉरवर्डग यातुन रोजगार वाटुन स्थानिकांची क्रियाशक्ती वाढेल त्यातुनच पुढे शाळा , कॉलेज , डॉक्टर या सुविधांची रेलचेल होण अपेक्षित होत मागील दशकात गुजरातच्या वेगवान औद्योगिक विकासाचा बोलबाला होता . गुजरातमध्ये जी औद्योगिक गुंतवणूक आली ती तिथल्या मुद्रा पिपावाव , कांडला या पोर्ट भोवतालीच झालीय . बंदरांवर केवळ मालाची चढ उतारच नव्हे तर परदेशातुन स्वस्त कच्चा माल आणुन मुल्यवर्धित पक्का माल उत्पादनाचे कारखाने बंदरांजवळ उभारता येतात . गुजरातच्या राजकीय धुरीणांनी जगातील सर्वात पातळ काचेच बोरोसील कंपनीमार्फत उत्पादन सुरु केल , इलेक्ट्रक वाहनांसाठी लागणार्या लिथीअम आयर्न बॅटरीचा कारखाना सुझुकी मोटर्समार्फत सुरु केला , ग्रीन एनर्जी साठी टिकाऊ सोलर पॅनलचे परदेशी कंपनीच्या सहयोगाने उत्पादन सुरु केले . असे अनेक भविष्याचा वेध घेणारे तंत्रज्ञान भिमुख उत्पादन कारखाने सुरु केले पण महाराष्ट्र सरकार कोकणातील बंदरांबाबत उदासीन असल्याचे दिसून येतेय . मुंबईतल्या सुविधापुर्ण वातावरणात आयुष्य व्यथित करणार्या कोकणच्या बहुसंख्य लोकप्रतिनिधीना कोकणी गावे ओस का पडताहेत याचा ना अभ्यास आहे ना तो करायची इच्छा आहे.
Post a Comment