सर्वधर्मीयांमुळेच देशाची ऐक्यता शक्य आ. सुनिल तटकरे यांचे सर्वधर्म मेळाव्यात प्रतिपादन


सर्वधर्मीयांमुळेच देशाची ऐक्यता शक्य आ. सुनिल तटकरे यांचे सर्वधर्म मेळाव्यात प्रतिपादन
श्रीवर्धन : श्रीकांत शेलार
देश जगाची महासत्ता बनण्याचा जो प्रयत्न करत आहे त्यासाठी देशातील सर्वधर्मीय जनतेने एकत्रित येण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनिल तटकरे यांनी बोर्लीपंचतन येथे केले. मंगळवारी, ता. 17 एप्रिल रोजी श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथे आयोजित सर्वधर्म समभाव मेळाव्यात ते बोलत होते.सुनील तटकरे पूढे म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले त्यांच्या विचारांची परिपूर्तता पुढच्या कालावधीत करणे अत्यंत आवश्यक आहे. भगवान महावीर यांनी जैन धर्माची स्थापना करत असताना अहिंसेचा विचार त्यावेळी दिला. गौतम बुद्धांनी देखील अहिंसेचा संदेश देत असताना शांततेचा मार्ग कशाप्रकारे देशात प्रस्थापित होईल याचा प्रयत्न केला. आज त्याच विचारांची गरज असल्याचं मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. देशाची ऐक्यता मजबूत करायची असेल देशातील धर्मनिरपेक्ष विचार , सर्वधर्मीय नागरिक हा सुरक्षित पणे जीवन जगू शकला पाहिजे या भूमिकेची ताकद व शक्ती वाढवण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे असे तटकरेंनी सांगितले.
या कार्यक्रमात महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरत गोगावले यांनी भेट दिली. राजकारण बाजूला ठेवत सर्वधर्म समभाव कशाप्रकारे प्रस्थापित करता येईल बाबत मार्गदर्शन केले. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जागतिक राष्ट्रीय विश्वशांतीदूत व जमियते उल्मादेहिंद चे अध्यक्ष सय्यद अर्षद मदनी यांनी विश्वशांती चा संदेश दिला. मध्यप्रदेश येथील विश्वहिंदू सत्यशोधक मिशन आचार्य शंकराचार्य सत्यानंद जी महाराज, मातंगगड आश्रम चे आचार्य महंत बाबास्वामी सत्यानंदासजी यांनी मानवतावादी दृष्टीकोनातून देशात शांतता व देशाची ऐक्यता अबाधीत राखण्यासाठी विविध उदाहरणे देत उपस्थितांना प्रबोधित केले.महंमद मेमन,निवास गाणेकर,रमेश घरत,सुकुमार तोडलेकर,झोलके पाटील,गणेश पाटील,उदय बापट,अविनाश कोलबेकर,अफजल मेमन, शंकर गाणेकर,एजाज हवालदार, मुंब्रा चे आमदार जितेंद्र आव्हाड दे देखील या कार्यक्रमात उपस्थित होते.
बोर्लीपंचतन व म्हसळा येथील आमरते शरिया हलका आणि अंजुमन दर्दमंदान तालीम व तरक्की यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमात यशस्वीपणे पार पडला. श्रीवर्धन चे उपविभागीय पोलिस अधिकारी बाबुराव पवार व दिघी पोलिस ठाण्याचे सहा पोलिस निरीक्षक धर्मराज सोनके यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा