श्रीवर्धन मध्ये अभिनव भारत संघाचा ‘ माझे गाव , माझी शाळा ’ उपक्रम...



 श्रीवर्धन 
ग्रामीण भागा तील तरुण शहरी भागातील तरुणांपेक्षा जास्त कष्टाळू आहे . त्यास योग्य मार्गदर्शन मिळाले तर आगामी काळात स्पर्धा परीक्षेत ग्रामीण भागातील तरुण निश्चित यश संपादन करेल , असा विश्वास सांगलीचे आयकर आयुक्त वैभव ढेरे यांनी व्यक्त केला . अभिनव भारत संघाने आयोजित केलेल्या माझे गाव माझी शाळा या उपक्रमात बोर्ली पंचतन येथील मोहनलाल सोनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करताना वैभर ढेरे बोलत होते . आज स्पर्धा परीक्षेत लाखो विद्यार्थी सहभागी होत आहेत , त्यामुळे स्पर्धा वाढली आहे शहरी भागात विविध क्लासेस उपलब्ध असतात . त्यामळे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळते व ते विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतात . ग्रामीण भागात तरुणांमध्ये प्रचंड ऊर्जा सामावलेली आहे या उर्जेस योग्य पद्धतीने वापरले पाहिजे . ग्रामीण तरुणाच्या पंखांना बळ देण्याचे काम आज अभिनव भारत संघ करत आहे स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी आपल्या मनाची तयारी करा . यश व अपयश दोन्ही पचवण्याची तयारी ठेवा . कठोर मेहनत व जिद्द यश प्राप्ती करून देतेच . असा विश्व स वैभव ढेरे यांनी व्यक्त केला . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा