बॅरिस्टर ए . आर . अंतुले कोकणच्या विकासाचे विश्वस्त
डॉ . मुईज़ शेख अध्यक्ष , म्हसळा तालुका काँग्रेस
काही गावं आणि नावं मनात कायमचे घर करून राहतात या उक्तीनुसार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय आरोग्यमंत्री व अल्पसंख्याक मंत्री स्वर्गीय बॅरिस्टर ए . आर अंतुले यांचे व्यक्तिमत्व , नेतृत्व आणि कर्तृत्व आजही दीपस्तंभाप्रमाणे उजळत आहे . यातच बॅरिस्टर ए . आर . अंतुले यांचे महत्त्व आणि मोठेपणा सामावले आहे अनेक नररत्नांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या ऐतिहासिक रायगड जिल्ह्याचे सुपुत्र तथा कोकणच्या विकासाचे विश्वस्त बॅरिस्टर ए . आर . अंतुले यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९२९ मध्ये म्हसळा तालुक्यात आंबेत या गावी झाला . अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कला शाखेतील बी . ए . हि पदवी संपादन करुन बॅरिस्टर ए . आर अंतुले यांनी कायद्यातील बॅरिस्टर ही उच्च पदवी प्राप्त करून मुस्लीम समाजासमोर उच्च शिक्षणाचा आदर्श ठेवला . न्यायालयाच्या चार भिंतीच्या आत मूठभरांची वकीली न करता समाजातील उपेक्षीत पिडीत , विकासापासून , परिवर्तनापासून वंचित राहिलेल्यांची सनद घेऊन समाजकारणात व राजकारणात बॅरिस्टर ए . आर . अंतुले सक्रीय राहिल्यामुळे त्यांचा जनाधार दिवसेंदिवस वाढू लागला . महाराष्ट्राच्या समाजकारणात - राजकारणात १९६२ पासून बॅरिस्टर ए . आर . अंतुले हे नाव उदयाला आले १९६२ ते १९७६ या कालावधीत श्रीवर्धन मतदारसंघाचे विधानसभेत त्यांनी प्रतिनिधीत्व केले . १९७६ ते १९८० या कालावधीत राज्यसभेचे सदस्य म्हणून काम करणारे बॅरिस्टर ए . आर . अंतुले यांनी देशाच्या राजकारणात आपल्या नेतृत्व गुणांचा परिचय करून दिला . महाराष्ट्राचे मुस्लीम समाजाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून बॅरिस्टर ए . आर अंतुले यांनी १९८० ते १९८२ या कालावधीत अनेक जनहिताची कामे करून महाराष्ट्रातील जनतेला अभ्यासू . परखड आणि धाडसी नेतृत्वाचे दाखवून दिले . बॅरिस्टर ए . आर . सामर्थ्य अंतुले यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकालात प्रत्येक गावात गावसुधार समितीची स्थापना करून गाव सक्षम , स्वयंपूर्ण आणि विकासाभिमुख बनविण्यासाठी अनेक धोरणांची अंमलबजावणी केली . कोकणच्या विकासासाठी पूल , रस्ते , एस . टी . , आरोग्य , शिक्षण , उद्योगधंदे यांची गरज आहे हे ओळखून बॅरिस्टर ए . आर . अंतुले यांनी अनेक धोरणात्मक निर्णय मूर्त स्वरुपात आणून कोकणच्या विकासाचा आलेख उंचविला . धाडसी निर्णय घेण्यात माहीर असलेले अॅरिस्टर . आर . अंतुले यांनी रत्नागिरी व औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन करून दोनही जिल्ह्यांना विकासाच्या दृष्टीने गतिमान केले लातूर , जालना , सिंधुदुर्ग या जिल्ह्यांची निर्मिती करून प्रशासनाचे विकेंद्रीकरण केले . रोहा नागोठणे येथे एम . आय . डी . सी . प्रकल्प आणून अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली कुलाबा जिल्ह्याला रायगड हे ऐतिहासिक नाव देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना उजाळा दिला छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्र मंत्रालयामध्ये लावण्याचा निर्णय बॅरिस्टर ए . आर अंतुले यांनी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदराची भावना व्यक्त कोरडवाहू शेतकच्यांचे रु . १५० कोटी कर्जमाफ करण्याचा धाडसी निर्णय बॅरिस्टर ए . आर . अंतुले यांनी घेतला . गोरगरीब गरजू लोकांच्या उदरनिर्वाहासाठी संजय गांधी निराधार योजना राबवून अनेक गोरगरिबांचे आशीर्वाद मिळविले . स्वातंत्र्यसैनिकांचे आजच्या पिढीला स्मरण व्हावे या हेतूने हुतात्मा स्मारकांची उभारणी करण्यासाठी बॅरिस्टर ए . आर . अंतुले यांनी योगदान दिले .
आजच्या पिढीला आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी या उद्देशाने बॅरिस्टर ए . आर . अंतुले यांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ स्थापन करून राज्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालये तंत्रज्ञान विद्यापीठाशी संलग्न केली . कोकण उन्नती मित्र मंडळाच्यावतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देऊन मुरुड व म्हसळा येथे वरिष्ठ कला - वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाची स्थापना करून परिसरातील विद्याध्यना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली . रेवस ते रेड्डी हा सागरी मार्ग सुरु करण्याचा त्यांचा मानस होता . समुद्र किनारी असलेल्या तालुक्यांना विकासाची संधी रेवस रेड्डी या सागरी मार्गामुळे मिळणार होती . केंद्रीय आरोग्यमंत्री असताना देशात पल्स पोलिओ निर्मूलन मोहीम सुरु करून देश पोलिओमुक्त करण्याचे श्रेय बॅरिस्टर ए . आर . अंतुले यांना दिले जाईल धर्मनिरपेक्ष विचारांशी बांधिलकी व सामिलकी मानणारे बॅरिस्टर ए . आर अंतुले यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपली राजकीय कारकीर्द सुरु केली . काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांचे समर्थन व संयोजन करणारे बॅरिस्टर ए . आर अंतुले यांनी इंदिरा गांधी , संजय गांधी याना पडत्या काळात साथ देऊन गांधी घराण्याच्या प्रती आपली राजकीय निष्ठा व्यक्त करून काँग्रेसला पाठबळ दिले . सार्वजनिक जीवनात काम करताना काहीजण सुखावतात तर काही दुखावतात . राजकीय सत्ता स्पर्धे तून बॅरिस्टर ए . आर . अंतुले यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला . बॅरिस्टर . आर अंतुले यांची न्यायालयाने निदष मुक्तता केली . महाराष्ट्र , कर्नाटक सीमावादाच्या बाबतीत नियुक्त केलेल्या महाजन अहवालाची महाजन रिपोर्ट अनकव्हर्ड हे पुस्तक लिहून महाजन आयोगाची कठोर समीक्षा अॅरिस्टर ए . आर अंतुले यांनी केली . तर अपॉइंटमेंट ऑफ जस्टीस ऑफ इंडिया हे पुस्तक लिहून चीफ जस्टीस ऑफ इंडिया यांची नियुक्ती करण्याच्या बाबतीत कायदेशीर मार्गदर्शन अॅरिस्टर ए . आर . अंतुले यांनी केले . कोकणच्या विकासाचे विश्वस्त म्हणून सर्वांच्या स्मृतीपटलावर कोरलेले बॅरिस्टर ए . आर अंतुले यांना माझे विनम्र अभिवादन.
Post a Comment