मेंदडी वार्ताहर
ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यातून आय एस ओ मानांकित आदर्श शाळा खरसई मराठी कचरामुक्त शाळा म्हणून घोषित करण्यात आली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जि प चे पाणी पुरवठा स्वच्छता मिशनचे प्रकल्प व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी खरसई शाळा कचरामुक्त शाळा असल्याचे जाहीर केले.यावेळी कृषी विस्तार अधिकारी भोगे ,राज्यस्तरीय साधन व्यक्ती गणेश खातू,सरपंच महादेव कांबळे,ग्राम परिवर्तक नीलम म्हस्के,मुख्याध्यापिका जोशी,बिर्जे मॅडम,सानप सर,गाडेकर सर,राठोड सर,मडवी सर,पाटील मॅडम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.२६ जानेवरीचे औचित्य साधून शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून व ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वच्छता विषयावर पथनाट्य सादर केले होते याचा परिणाम म्हणून ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण,कचऱ्यामुळे होणारे दुष्परिणाम ,आरोग्य व सामाजिक जीवन संतुलनाकरिता ग्रामस्थांनी पुढाकार घेतला असून गावामध्ये स्वच्छतेचा चांगला संदेश प्रसारित झाला आहे.शाळा कचरामुक्त होण्याकरिता गट विकास अधिकारी वाय एम प्रभे,गटशिक्षणाधिकारी गजानन साळुंखे,शाळा व्यस्थापन अध्यक्ष निलेश मांदाडकर,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य,शिक्षक,विद्यार्थी व ग्रामस्थ यांचा मोलाचा वाटा असून खरसई शाळा कचरामुक्त घोषित झाल्याने जिल्हाभरातुन कौतुकाचा वर्षाव केला जात आहे
खरसई शाळेला यापूर्वी आय एस ओ मानांकन,जिल्हा परिषदेचा आदर्श शाळा पुरस्कार,तंबाखूमुक्त शाळा नंतर जिल्ह्यातील पहिली कचरामुक्त शाळा जाहीर झाल्याने शाळेने नवा बहुमान प्राप्त झाला आहे
Post a Comment