शेखाडी समुद्र किनारी अनधिकृत भराव महसुल विभागाचे दुर्लक्ष ; कारवाई कधी होणार...? नागरिकांचा सवाल...
श्रीवर्धन : संतोष चौकर
श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी गावच्या हद्दीत असलेल्या समुद्र किनारी भरतीचे पाणी येत असलेल्या ठिकाणी एका खाजगी जागा मालकाने मातीच्या भरावाचे काम सुरू केले आहे विशेष बाब म्हणजे सदर भराव होत असलेले ठिकाण जागा मालकाने दिवेआगर श्रीवर्धन मागच्या बाजूने लोखंडी पत्रे लाऊन झाकुन घेतले आहे १२ मार्च १९९३ रोजी मुंबई शहरात भीषण बाँबस्फोट मालिका घडली होती . तपास सुरु झाल्यानंतर बाँबस्फोटांतील वापरले गेलेले आरडीएक्स हे संहारक स्फोटक श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी समुद्र किनारी उतरविले गेल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती . त्यानंतर संपूर्ण कोकण किनाऱ्यावर तटरक्षक दल , केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग व महाराष्ट्र पोलिस यांची संयुक्त गस्त सुरू करण्यात आली . अशा संवेदनशील ठिकाणी सीआरझेड कायद्याचे खुलेआम पणे उल्लंघन करुन भराव होत असताना महसुल विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने महसुल प्रशासन बघ्याची भूमिका कोणत्या कारणासाठी घेत आहे अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे . सदरचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असुन रस्त्याच्या बाजूला जराही जागा न सोडता निळ्या रंगाचे पत्रे उभे केले आहेत . सार्वजनिक बांधकाम विभागाचे आधिकारी सुद्धा या गोष्टीकडे काणाडोळा करीत असल्याचे पहायला मिळत आहे सदर ठिकाणी होत असलेला अनधिकृत भराव कोणत्या कारणास्तव केला जात आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे शेखाडी समुद्रकिनारी अशाप्रकारे अनेक ठिकाणी भराव करून बांधकाम होण्याची शक्यता असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने व पर्यावरणाच्या दृष्टीने महसूल विभागाने तातडीने कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
Post a Comment