एसटी महामंडळ महाराष्ट्राची लोकवाहिनी आहे ग्रामीण व शहरी वाहतुकीसाठी लाखो लोकांच्या विश्वासास पात्र सेवा महामंडळ निरंतर देत आहे . युती सरकारने सत्ता प्राप्तीनंतर एसटी महामंडळाच्या आधुनिकीकरणास प्रारंभ केला . बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती प्रसंगी शिवशाही सेवेची घोषणा करण्यात आली . रायगड एसटी विभागात ११ शिवशाही बसेस दाखल झाल्या आहेत . श्रीवर्धनला दोन , महाड आठ अलिबागला एक बस देण्यात आली आहे आधुनिक शिवशाही बसेस अगोदरच्या निमआराम सेवेच्या तुलनेत सरस आहेत . निमआराम सेवा भाड्याच्याही तुलनात्मक दृष्ट्या शिवशाही सरस आहे प्रतिटप्पा दहा रु पये प्रमाणे भाडे दर आकारला जाणार आहे मुंबई ते श्रीवर्धन भाडे निमआरामच्या तुलनेत ३० रुपयांनी जास्त आहे . सेवेचा दर्जा विचारात घेता , सर्व सामान्य व्यक्ती आनंदाने शिवशाहीचा स्वीकार करणार आहे . महामंडळाच्या आधुनिकीकरणाची ही सुरुवात समजली जाते . संपूर्ण महाराष्ट्रभर वाहतूक सेवा देण्याचे काम एसटी महामंडळ ७५ वर्षापासून करत आहे. श्रीवर्धन - भिवंडी या मार्गावर पहिली शिवशाही बस मंगळवारी धावली . श्रीवर्धन तालुक्यातील मोठा जनसमुदाय मुंबई - बोरीवली व नालासोपारा या परिसरात कामानिमित्त वास्तव्य करतो , त्यामुळे श्रीवर्धन आगाराच्या उत्पन्नात त्याच्यामुळे जास्त भर पडते . आगाराच्या वार्षिक उत्पन्नात मुंबई बोरीवली व नालासोपारा मार्गावरील उत्पन्न जास्त असते . ग्रामीण भागात शालेय विद्यार्थी , नोकरदार कामगार व व्यापारी वर्ग एसटीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याचे चित्र आहे . विद्यार्थी मासिक पास व त्रैमासिक पास यापासून एसटी प्रशासनास आगाऊ रक्कम प्रत्येक महिन्यास मिळते . राज्यात वाहतूक स्पर्धा वाढली आहे बेकायदा खासगी वाहतुकीचे प्रमाण अवाजवी आहे राज्य सरकार बेकायदा चाहतूक रोखण्यात अयशस्वी ठरत आहे परिणामी , एसटीच्या हक्कांचे उत्पन्न बुडत आहे दर्जेदार व सुरक्षित सेवा पुरवण्यात एसटी महामंडळ अग्रणी आहे स्पर्धेच्या युगात एसटी परिवर्तन स्वीकारत आहे . शिवशाही सेवा त्याचेच प्रतीक समजले जाते . साधी , निमआराम , यशवंती ब शिवशाही निश्चित स्पर्धेच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरत आहे .
एसटी कामगारांनी पगारवाढीसाठी केलेल्या संपाने महाराष्ट्रातील कामगार विश्व ढवळून निघाले आगामी काळात स्पर्धेत टिकण्यासाठी एसटी आधुनिकतेची गरज आहे शिवशाही सेवा जिल्ह्यात प्रथम श्रीवर्धन आगारात सुरु झाली आहे तालुक्यातील जनता त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देईल , याची खात्री आहे . - रमा गाडेकर , आगारप्रमुख , श्रीवर्धन
शिवशाही बस श्रीवर्धन आगाराने सुरु केली , याचा आनंद आहे . ती निरंतर चालू ठेवावी .
-अनिल पवार, प्रवासी
Post a Comment