राज्यमंत्री रवींद्र चव्हाण रायगडचे नवे पालकमंत्री : प्रकाश मेहता यांना अखेर डच्चु


प्रतिनिधी
ठाणे जिल्ह्यातील कल्याण - डोंबिवली , मिरा - भाईंदर व रायगडमधील पनवेल या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महत्वाची कामगिरी करणारे अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या गळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाची माळ घातली आहे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्याकडुन हे पद काडुन घेतले आहे . रायगड जिल्ह्यातील स्थानिक भाजप कार्यकत्यांमध्ये पालकमंत्री मेहता यांच्याविषयी नाराजी होती . मुंबईपासुन जवळ असतानाही ते  शासकीय आणि पक्षाच्या कार्यक्रमांना सहसा जात नसत . तिसरी महामुंबई समजल्या जाणार्या या जिल्ह्यामध्ये व्यवसायाच्या निमीत्ताने अनेक गुजराती बांधव येत आहेत . त्यांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम मेहता यांच्याकडून केले जात नाही . त्यामुळे पक्षातही त्यांच्याविषयी खदखद होती . सध्या कोकणात भाजपाचा वजनदार नेता नाही . शिक्षणमंत्री विनोद तावडे हे कोकणातील आहेत . पण तेसुध्दा पक्षवाढीसाठी प्रयत्न करत नाहीत . सध्या पनवेलचा अपवाद वगळता कोकणात भाजपचे प्राबल्य दिसत नाही . राज्यमंत्री चव्हाण यांनी तीन महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला चांगले यश मिळवुन दिले आहे . ते मुळचे कोकणातील असल्यामुळे त्यांच्यावर रायगडचे पालकमंत्री  सोपविल्याने पक्षाला राजकीय लाभ होईल , या भावनेने चव्हाण यांच्यावर नवीन जबाबदारी दिल्याचे बोलले जात आहे 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा