आगरी पतसंस्थेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न


आगरी समाज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था व म्हसळा,श्रीवर्धन आगरी समाज संघटनेच्या संयुक्त विद्यमाने दहावी,बारावी व पदवीधर विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.यावेळी पतसंस्थेचे चेअरमन तथा माजी सभापती महादेव पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संतोष पाटील,अनंत कांबळे,संतोष शेवाळे,मधुसूदन पाटील,छाया म्हात्रे,राजेश्री पाटील,अनंत भायदे,राजेंद्र घोसाळकर, मधुकर पाटील,अनंत धनावडे,महेश पाटील,रामदास कांबळे,भाऊ पयेर, समीक्षा नाक्ती आदी मान्यवर उपस्थित होते.आगरी समाज संघटनेच्या वतीने सातत्याने समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून त्याचा लाभ समाजातील सर्व घटकांना होत असल्याचे प्रतिपादन महादेव पाटील यांनी केले. आपण समाजाचे देणं लागत असुन पतसंस्थेच्या वतीने व्यवसायासाठी कर्जवितरण करण्यात येतो याचा फायदा आगरी समाजातील अनेक तरुणांना झाल्याचे त्यांनी सांगितले.याप्रसंगी आगरी बांधव व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा