वास्तविक मनुष्य होण्यासाठी आपल्यात मानवी गुण असणे आवश्यक - सत्गुरु माता सुदीक्षाजी महाराज


जीवनाला नवी दिशा , ऊर्जा आणि सकारात्मकता देऊन गेला महाराष्ट्राचा 54 वा निरंकारी संत समागम



टीम म्हसळा लाईव्ह

 " आम्ही वास्तविक मनुष्य आहोत , म्हणवून घेत असू तर आपल्यामध्ये मानवी गुण असण्याची नितांत गरज आहे . या विपरीत कोणतीही भावना मनामध्ये येत असेल तर स्वत चे मूल्यांकन करावे लागेल , सूक्ष्म नजरेने मनाच्या तराजूत तोलून पहावे लागेल . असे केले तर आपण कुठे चुकत आहोत हे आपल्याला उमगू शकेल . " असे प्रेरणादायी विचार निरंकारी सत्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी महाराष्ट्राच्या तीन - दिवसीय 54 व्या वार्षिक संत समागमाच्या समारोप प्रसंगी काढले . 28 फेब्रुवारी रोजी या संत समागमाची यशस्वीपणे सांगता झाली . व्हच्र्युअल रूपात आयोजित करण्यात आलेला हा तीन - दिवसीय संत समागम जीवनाला एक नवी दिशा , ऊर्जा आणि सकारात्मकता देऊन गेला . समागमाचे थेट प्रसारण निरंकारी मिशनची वेबसाईट तसेच संस्कार टी व्ही . चॅनलच्या माध्यमातून करण्यात आले . संपूर्ण भारतासह विदेशातील लाखो निरंकारी भक्तांनी तसेच अन्य भाविक सज्जनांनी घरबसल्या या संत समागमाचा भरपूर आनंद प्राप्त केला . सद्गुरु माता सुदीक्षाजी म्हणाल्या , की वास्तविक मनुष्य होण्यासाठी सकळजनांवर प्रेम करणे , सर्वांच्या प्रति सहानुभूती बाळगणे , उदारमतवादी होऊन इतरांच्या दोषांकडे दुर्लक्ष करुन त्यांच्यातील सद्गुण ग्रहण करणे , सर्वांना समदृष्टीने पाहणे आणि आत्मवत भावनेने इतराचे दुःखदेखील स्वतःच्या दुःखासमान मानणे यांसह अनेक मानवी गुणांनी युक्त होण्याची आवश्यकता आहे . माता सुदीक्षाजी यांनी पुढे सांगितले , की मनुष्य स्वतःला धार्मिक समजतो , आपल्या धर्मातील गुरु - पीर - पैगंबरांच्या वचनाचे पालन करण्याचा दावा करतो . आपली कुठेही श्रद्धा असू द्या , प्रत्येक ठिकाणी मानवता हाच खरा धर्म असून ईश्वराशी नाते जोडून आपले जीवन सार्थक करावे अशीच शिकवण दिली गेल्याचे आढळते . जीवन अनमोल आहे . कोणत्याही वयात असलेला मनुष्य ब्रह्मज्ञानी संतांच्या सान्निध्यात येऊन ईश्वराला क्षणार्धात जाणू शकतो . संत समागमाच्या पहिल्या दिवशी सत्गुरु माता सुदीक्षाजी यांनी आपल्या प्रवचनामध्ये सांगितले , की ईश्वराला कोणत्याही नावाने संबोधित करा तो सर्वव्यापी असून कणकणवासी आहे . प्रत्येकाचा आत्मा हा निराकार ईश्वराचाच अश आहे . आम्हाला स्वतःची खरी ओळख करुन घ्यायची असेल तर आधी परमात्म्याची ओळख करुन घ्यावी लागेल . कारण ब्रह्मानुभूतीनेच आत्मानुभूती शक्य आहे . स्थिर प्रभूशी नाते जोडल्याने आपल्याला स्थिरतेबरोबरच शांती व समाधानही लाभते . परमात्मा समस्त विश्वाचा कर्ता - धर्ता आहे . याची अनुभूती झाल्यानंतर प्रत्येक कार्य सहजतेने स्वीकारण्याची युक्ती प्राप्त होते . स्थिर परमात्म्याचा आधार घेतल्याने जीवनातील चढ - उतारांमध्येही समाधानाची अवस्था टिकून राहते . सत्गुरु माताजींनी पुढे प्रतिपादन केले , की आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्येक स्थितीचे आकलन करण्यासाठी , शरीराचे उचित संचालन करण्यासाठी ज्ञानेंद्रियांचा वापर करावा , मात्र त्यांच्या अधीन होऊ नये . इंद्रिये आपल्या नियंत्रणात असतील तर आपण त्यांचा सदुपयोग करुन घेऊ शकतो . याकरिता इंद्रियांमध्ये गुंतून न जाता त्यांना आपल्या काबूत ठेवायचे आहे . 

सेवादल रॅली
समागमाच्या दुसऱ्या दिवसाचा प्रारंभ एका रोमहर्षक सेवादल रॅलीने झाला . त्यामध्ये महाराष्ट्राच्या सर्व भागातील सेवादल बंधु - भगिनी यांनी भाग घेतला . रॅलीमध्ये शारीरिक कवायती व्यतिरिक्त विविध खेळ आणि मल्लखांब , मानव मनोरे यांसारख्या साहसी करामती दाखविण्यात आल्या शिवाय मिशनच्या शिकवणूकीवर आधारित लघुनाटिकाही प्रस्तुत करण्यात आल्या सेवादल रॅलीमध्ये आपला आशीर्वाद प्रदान करताना सत्गुरु माताजी म्हणाल्या , की अवध्या मानवतेला आपला परिवार मानून , अभिमानाला त्यागून , समयाची गरज लक्षात घेऊन , मर्यादा व अनुशासनामध्ये राहून मिशनकडून वर्षानुवर्षे सेवेचे योगदान दिले जात आहे . सेवा करताना प्रत्येकाला ईश्वराचा अंश मानून सेवा करायला हवी कारण मानवसेवा ही परमात्म्याचीच सेवा होय . दुसऱ्या दिवशी सायंकाळी झालेल्या सत्संग समारोहाला संबोधित करताना सत्गुरु माताजींनी सांगितले , की जीवनात स्थिरता आणण्यासाठी सजगता आणि विवेकाची गरज असते आणि त्यासाठी आपण परमात्म्याला आपल्या हृदयात स्थान देण्याची आवश्यकता आहे . हृदयातरी ईश्वराचा निवास झाल्यावर मन आपोआपच मन निर्मळ होते , त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारात्मकतेला स्थान उरत नाही . सत्गुरु माताजींनी पुढे सांगितले , की मागील संतांचे दाखले पाहिले तर त्यांनीही हेच सांगितले आहे , की या ईश्वराला खुल्या नयनांनी पाहिले जाऊ शकते . परमात्म्याला पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या निजस्वरूपाची ओळख होते . आपण शरीर नसून आत्मा आहोत याची जाणीव होते . या बोधाने आपण जीवनाला योग्य दिशा देऊ शकतो , युगानुयुगे संतांनी , भक्तांनी हेच सांगितले , की परमात्म्याशी नाते जोडून भक्तिमार्गाने चालूनच जीवनाचे कल्याण होऊ शकते , आपला आत्मा बंधनमुक्त होऊन मोक्ष प्राप्त करु शकतो . 

कवि दरबार

समागमाच्या तिसऱ्या दिवसाचे मुख्य आकर्षण होते बहुभाषी कवी संमेलन , ज्याचे शीर्षक ' स्थिरतेशी नाते मनाचे जोडून , जीवन आपले सहज करु या असे होते . या विषयावर आधारित मराठी , हिंदी , सिंधी , गुजराती , पंजावी आणि भोजपूरी भाषांमधून कित्येक कविनी आपल्या कविता सादर केल्या . या कवी संमेलनामध्ये जीवनातील अस्थिरतेची कारणे , स्थिरतेची गरज आणि स्थिरतेचे उपाय यावर प्रभावशाली रीतीने कवी सज्जनांनी प्रबोधन केले . समागमाच्या तिन्ही दिवशी राज्याच्या वेगवेगळ्या भागातील तसेच जवळपासच्या राज्यासह देशाच्या काही प्रांतातील व विदेशातील अनेक वक्त्यांनी विविध भाषांतून आपले प्रेरणादायी विचार व्यक्त केले . याशिवाय संपूर्ण अवतार बाणी आणि संपूर्ण हरदेव बाणीतील पावन पदांचे कीर्तन , पुरातन संतांची अभंगवाणी तसेच मिशनच्या गीतकारांनी तयार केलेल्या प्रेरणादायी भक्तीरचना प्रस्तुत करुन मिशनच्या विचारधारेवर आधारित सारगर्भित संदेश प्रसारित करण्यात आला . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा