टीम म्हसळा लाईव्ह
लॉकडाऊनमुळे थांबलेली कर्जवसुली, ठप्प झालेला व्यवसाय आणि घटलेल्या उत्पन्नामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणार्या राज्यातील तब्बल १८ हजार सहकारी पतसंस्थांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
जागतिक महामारीचा नागरी, ग्रामीण आणि पगारदार पतसंस्थांच्या कारभारावर परिणाम होऊ नये म्हणून सहकार विभागाने ऑडीट वर्गाच्या गुणांमध्ये सरसकट १० टक्क्यांची शिथिलता आणली आहे. त्यामुळे या संकट काळातही संस्थांना आपला ऑडीट वर्ग कायम राखता येणार आहे.
Post a Comment