श्रीवर्धन येथे शांतता समितीची बैठक संपन्न
सामाजिक सलोखा ही प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे. - प्रमोद बाबर, पोलीस निरीक्षक
श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
आपल्या देशात अनेक जातीधर्माचे लोक सुखाने व आनंदाने सलोख्याचे जीवन जगत आहेत .समाजातील सलोखा अबाधित ठेवणे हे प्रत्येक नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे .असे प्रतिपादन प्रमोद बाबर यांनी केले .श्रीवर्धन पोलीस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बाबर यांनी श्रीवर्धन मधील विविध प्रश्नांवर मार्मिक भाष्य करत उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला आहे .समाजातील प्रत्येक घटकास अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आले आहे .आपण वर्षे भर अनेक सण ,उत्सव व कार्यक्रम आयोजित करत असतो .प्रत्येकाचा हेतू व उद्देश चांगला असतो .त्यामुळे आपण सर्व एकमेकांच्या कार्यक्रमात हिरीरीने सहभाग घेतो .असे बाबर यांनी सांगितले .श्रीवर्धन मधील वाहतुक कोंडीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे .त्या नुसार पोलीस प्रशासन कार्यवाही करत आहे .जनतेने सहकार्य करावे जेणे करून वाहतुक कोंडीचा समस्या कायम स्वरूपाची निकाली निघेल .रस्त्याच्या दुतर्फा बेकायदेशीर वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल .शहर परिसरात उपद्रवी मोकाट जनावरांच्या मालकांना योग्य समज देऊन शहर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे बाबर यांनी सांगितले .श्रीवर्धन तालुक्यातील विविध समाज समितीचे अध्यक्ष , प्रतिष्ठित नागरिक , नगरसेवक , पत्रकार व पोलीस प्रशासनातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जे जे पाटील , जे जी पेडवी व डी एल पाटील शांतता समितीच्या बैठकीला हजर होते .
Post a Comment