श्रीवर्धन पोलीस ठाण्यात संविधान दिवस साजरा



सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस दल सदैव सज्ज ...... जीवन पाटील (साह्य पोलीस निरीक्षक )

श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते 

भारतीय समाजाला एकत्र ठेवण्याचे काम संविधानाने केले आहे .प्रत्येकाला घटनात्मक अधिकार प्रदान करण्यात आले आहेत .त्या मुळें सर्वसामान्य व्यक्ती निर्भय पणे जीवन जगत आहे .भारतीय पोलीस दल सर्वसामान्य व्यक्तीच्या सुरक्षेसाठी सदैव सज्ज आहे असे प्रतिपादन साह्य पोलीस निरीक्षक जीवन  पाटील यांनी केले .
श्रीवर्धन पोलीस ठाण्यात संविधान दिन व 26 /11 च्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .त्या प्रसंगी उपस्थित र ना राऊत महाविद्यालयातील शालेय विद्यार्थी , जेष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी ,पत्रकार व पोलीस ठाण्यातील कर्मचारी उपस्थित होते .सदर प्रसंगी जे जे पाटील यांनी संविधान निर्मिती , मानवी हक्क ,पोलीस प्रशासन व सर्वसामान्य जनता यांच्यातील संबध या विषयी मार्मिक भाष्य केले .पाटील यांनी 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या अशोक कामटे , विजय साळसकर , हेमंत करकरे व इतर सर्व शहीद कर्मचारी यांच्या कार्याचे कौतुक केले व पोलीस दलातील प्रत्येक घटक हा आपले आयुष्य लोकांच्या सुरक्षेसाठी खर्च करतो असे सांगितले .26/11 चा भ्याड हल्ला मानवतेला काळिमा फसवणारा हल्ला होता .सर्व सामान्य जनतेचे प्राण सदरच्या हल्ल्यात गेले .भारतीय सुरक्षा दल व पोलिसांनी सदरच्या हल्ल्याला सडेतोड उत्तर दिले .पोलिसांनी आपल्या पराक्रमाची शर्थ करत शत्रू राष्ट्राच्या नापाक कृतीला नाहीसे केले .भारतीय जनतेला आपल्या सुरक्षा दलाचा सार्थ अभिमान आहे असे जीवन पाटील यांनी सांगितले .सदरच्या कार्यक्रम प्रसंगी विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले .पोलीस ठाण्यात साह्य निरीक्षक अली  मुल्ला , जयंत पेडवी , संतोष लांगी , डी एच पाटील , संतोष गुरव , व तुकाराम महाडिक उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा