रस्त्यावरच थाटलेल्या दुकानात पर्यटनस्थळ हरवले
दांडगुरी : वार्ताहर
श्रीवर्धन तालुक्यातील 'हरिहरेश्वर' हे प्रसिद्ध धार्मिक व पर्यटन स्थळ आहे. प्रेक्षणीय स्थळ असलेल्या या पर्यटन स्थळी मूलभूत सुविधांचा वाणवा जाणवतो. ठिकठिकाणी कचरा, दुर्गधी यांमुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे . समुद्रकिनारी जीवरक्षक नसल्याने पर्यटकांना धोका निर्माण होतो. पर्यटकांच्या जीवाशी खेळ सुरू असलेला पाहायला मिळतो. या ठिकाणी जीवरक्षकांची नेमणूक करावी , अशी मागणी पर्यटकांनी केली आहे . हरिहरेश्वर हे ठिकाण दक्षिण काशी म्हणुन ओळखले जाणारे कोकणातील एक सुंदर ठिकाण . इथले सुंदर , स्वच्छ समुद्रकिनारे , नारळी - पोफळीच्या बागा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात , सोळाव्या शतकात बांधलेले हरिहरेश्वरचे प्राचीन मंदिर या टेकड्यालगत आहे . मंदिरात ब्रह्मा , विष्णू आणि महेश यांच्या मूर्ती आहेत . या मंदिराबरोबर कालभैरव व योगेश्वरीचे मंदिरसुध्दा पाहावयास सुंदर आहे , असे ऐतिहासिक , पर्यटन आणि धार्मिक महत्व असताना मात्र हे प्रेक्षणीय स्थळ आजही 'लक्ष देऊन दुर्लक्षित' राहिल्याचे येथे भेट दिल्यास जाणवते. हरिहरेश्वर हे पर्यटन स्थळ आहे. हे पर्यटन स्थळ पाहण्यासाठी अनेक पर्यटकांची गर्दी होत असते. पर्यटन विकास अंतर्गत हरिहरेश्वर पर्यटन ठिकाणाचा विकास करण्यासाठी सन २००४ - ०५ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती या मंजूर प्रामुख्याने नवाब लेक परिसर व परिसर , हरिहरेश्वर मंदिर व परिसर , धर्मशाळा व परिसर , अस्थिविसर्जन परिसर , स्मशानभूमी व परिसर , इंफ्रास्ट्रक्चर भूमि सुधारणा आणि लँडस्केपींग यांचा समावेश होता . प्रमुख कामांतर्गत अंतर्गत अनेक कामे केली गेली . कामावारती महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून आजतागायत तब्बल तेरा कोटी रुपये खर्च केले आहेत . मात्र पंधरा वर्षे उलटून गेली तरी हि कामे अद्यापही अपूर्ण राहिली असल्याचे पाहताक्षणी दिसते . अस्थिविसर्जन घाटावर जाताना दगडावरुन चालत समुद्रात जावे लागते . अशाने दुर्घटना होउ शकते . तेथे समुद्रात जाण्यासाठी कोक्रिट चा स्लोप बसवण्याची मागणी होत आहे . पर्यटन विकास अंतर्गत शौचालय बांधण्यात आले मात्र गेली कित्येक वर्षे पाण्याअभावी विनावापरा पडून आहे . किंबहुना पर्यटकांची गैरसोय होत आहे . शिवाय मोठ्या प्रमाणावरदुर्गधी पसरली आहे . सुलभ शौचालय ग्रामपंचायतकडे वर्ग केले नसल्याचे समजते . हरिहरेश्वरमध्ये पर्यटन विकास अंतर्गत मंजूर कामांपैकी हरिहरेश्वर मंदिर परिसर , धर्मशाळा परिसर , अस्थिविसर्जन परिसर , स्मशानभूमी परिसर , पायाभूत सुविधांचा विकास , भूमिसुधारणा आणि लॅण्ड स्केपिंग अंतर्गत बगिचे ही कामे अपूर्णच राहिल्याचे दिसतात . त्यामुळे पर्यटकांची नाराजी जाणवते . अस्थीविसर्जन तसेच प्रदक्षिणा मार्गात ठिकठिकाणी दुकाने थाटलेली दिसत आहेत . त्यामुळे परिसरात अस्वच्छता दिसत आहे . स्थानिक ग्रामपंचायत पर्यंटनचाही बाबत अनास्था असल्याचे दिसते आहे . समुद्रकिनारी पर्यटकांना जीव गमावल्याची घटना नवी नाहीत . समुद्रकिनारी हँड ड्रिल नसल्याने पर्यटक खडकाळ भागातून समुद्रकिनारी चालत राहतात . खडकावरील शेवाळ तसेच भरती ओहोटी न समजल्याने अनेक पर्यटकांना जीव गमवावा लागला आहे . मात्र जीवरक्षकाची नेमणूक झाली नाही .
हरिहरेश्वरला भेट दिल्यास येथील अस्वच्छता व असुविधा पाहून नाराजी वाटते. पर्यटकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. बहुतांशी विकासकामे अपूर्ण दिसतात. विशेषतः जीवरक्षक असावेच. पर्यटनाच्या बाबतीत या ठिकाणी सुविधा हा गरजेचे आहे.
-समीर , पर्यटक
विकासाला प्राध्यान्य देणार हरिहरेश्वर ग्रामपंचायत गेली तीन वर्षे शिवसेनेच्या हाती होती मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अमित खोत हे सरपंच म्हणून निवडून आले. ना सुनील तटकरे व जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हरिहरेश्वर चा विकास करणार असल्याचे सरपंच अमित खोत यांनी सांगितले.
-अमित खोत , सरपंच

إرسال تعليق